शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

राज्यातील ५० विद्यार्थी विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:54 IST

अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशी विद्यापीठातील परीक्षांच्या तयारीसाठी देशात अनेक खासगी संस्थाही आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अशा गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना ही संधी गमवावी लागते. परंतु आता अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देनागपुरात घेताहेत प्रशिक्षण : सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशी विद्यापीठातील परीक्षांच्या तयारीसाठी देशात अनेक खासगी संस्थाही आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अशा गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना ही संधी गमवावी लागते. परंतु आता अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे.विदेशात विविध विषयांमध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशातील नमांकित विद्यापीठे यासाठी प्रवेशपरीक्षा घेत असतात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. यानंतर त्या-त्या विद्यापीठांतर्फे शिष्यवृत्तीही दिल्या जातात. यासाठी भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अर्ज करीत असतात. विदेशातील विद्यापीठांच्या प्रवेशासाठी ‘जीआरई ’व ‘टफेल’ यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा अतिशय कठीण असतात. त्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणावर असते. या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी देशात अनेक खासगी प्रशिक्षण संस्थासुद्धा कार्यरत आहेत. परंतु त्यांचे शुल्क हे लाखात असते. किमान अडीच ते तीन लाख रुपयांचे पॅकेज या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था घेत असतात. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे ते स्वत:च्या ताकदीवर अभ्यास करीत असतात. यातून ही मुलं ही परीक्षा उत्तीर्णही करतात, परंतु त्यानंतरही खर्चाचा प्रश्न कायम राहतोच. त्यामुळे कितीही गुणवत्ता असली तरी मागासवर्गीय विद्यार्थी यात मागे पडतात. ही बाब लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत अशा विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागातर्फे राज्यस्तरावर स्वत:ची आॅनलाईन परीक्षा घेतली. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून संपूर्ण महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. यात २४ मुली व २६ मुलं आहेत. सध्या या मुलांना नागपुरात दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. विदेशातील विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करवून घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ कन्सलटन्सीची नेमणूकही झाली आहे. प्रशिक्षणासोबतच त्यांच्या राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्चही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे केला जात आहे, हे विशेष.अभिनव उपक्रमशासनाने एक चांगला व अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. या विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षण व राहण्या-खाण्याचीच सुविधा नव्हे तर त्यांना संपूर्ण साहित्यसुद्धा पुरविले जात आहेत. तसेच या विद्यार्थ्यांमधून ज्यांची निवड विदेशातील विद्यापीठात होईल, त्यांच्या कन्सलटन्सीचे कामही प्रतिष्ठानच सांभाळणार आहे. विद्यार्थ्यांला प्रवेशापासून तर विदेशात पाठवण्यापर्यंत सर्व काही प्रतिष्ठान करणार आहे.डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मुख्य समन्वयक व प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण

 

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती