शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यातील ५० विद्यार्थी विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:54 IST

अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशी विद्यापीठातील परीक्षांच्या तयारीसाठी देशात अनेक खासगी संस्थाही आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अशा गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना ही संधी गमवावी लागते. परंतु आता अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देनागपुरात घेताहेत प्रशिक्षण : सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशी विद्यापीठातील परीक्षांच्या तयारीसाठी देशात अनेक खासगी संस्थाही आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अशा गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना ही संधी गमवावी लागते. परंतु आता अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे.विदेशात विविध विषयांमध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशातील नमांकित विद्यापीठे यासाठी प्रवेशपरीक्षा घेत असतात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. यानंतर त्या-त्या विद्यापीठांतर्फे शिष्यवृत्तीही दिल्या जातात. यासाठी भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अर्ज करीत असतात. विदेशातील विद्यापीठांच्या प्रवेशासाठी ‘जीआरई ’व ‘टफेल’ यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा अतिशय कठीण असतात. त्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणावर असते. या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी देशात अनेक खासगी प्रशिक्षण संस्थासुद्धा कार्यरत आहेत. परंतु त्यांचे शुल्क हे लाखात असते. किमान अडीच ते तीन लाख रुपयांचे पॅकेज या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था घेत असतात. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे ते स्वत:च्या ताकदीवर अभ्यास करीत असतात. यातून ही मुलं ही परीक्षा उत्तीर्णही करतात, परंतु त्यानंतरही खर्चाचा प्रश्न कायम राहतोच. त्यामुळे कितीही गुणवत्ता असली तरी मागासवर्गीय विद्यार्थी यात मागे पडतात. ही बाब लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत अशा विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागातर्फे राज्यस्तरावर स्वत:ची आॅनलाईन परीक्षा घेतली. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून संपूर्ण महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. यात २४ मुली व २६ मुलं आहेत. सध्या या मुलांना नागपुरात दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. विदेशातील विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करवून घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ कन्सलटन्सीची नेमणूकही झाली आहे. प्रशिक्षणासोबतच त्यांच्या राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्चही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे केला जात आहे, हे विशेष.अभिनव उपक्रमशासनाने एक चांगला व अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. या विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षण व राहण्या-खाण्याचीच सुविधा नव्हे तर त्यांना संपूर्ण साहित्यसुद्धा पुरविले जात आहेत. तसेच या विद्यार्थ्यांमधून ज्यांची निवड विदेशातील विद्यापीठात होईल, त्यांच्या कन्सलटन्सीचे कामही प्रतिष्ठानच सांभाळणार आहे. विद्यार्थ्यांला प्रवेशापासून तर विदेशात पाठवण्यापर्यंत सर्व काही प्रतिष्ठान करणार आहे.डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मुख्य समन्वयक व प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण

 

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती