शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

नागपुरात उद्योजक बनविण्याचे आमिष दाखवून ४८ लाखांनी गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:17 IST

प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची बतावणी करून एक युवक ४८ लाख रुपये घेऊन फरार झाला. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआरोपी फरार : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची बतावणी करून एक युवक ४८ लाख रुपये घेऊन फरार झाला. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.ओमप्रकाश शर्मा (२८) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याने जयताळा मार्गावर मंगळमूर्ती चौकात नागपूर इंडस्ट्रीजच्या नावाने कार्यालय सुरू केले होते. त्याने जाहिरात देऊन नागरिकांना फसवले. जाहिरातीत प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपये कमवून यशस्वी उद्योजक होण्याचे आमिष दाखविले. नागरिक शर्मा त्याच्या संपर्कात आले. त्याने स्वत:ला कंपनीचा प्रतिनिधी असून दिल्लीवरून मशीनचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. दिल्लीवरून स्वत: मशीनची खरेदी केल्यास एक ते दीड लाख रुपये अधिक द्यावे लागतील असे त्याने सांगितले. शर्मा याने लहान मशीनची किंमत ४.५० लाख आणि मोठ्या मशीनची किंमत ६.५० लाख सांगितली. मशीनची खरेदी केल्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा आणि उत्पादनाच्या विक्रीची ग्वाही दिली. मशीनपासून अनेक आकाराच्या बॉटल तयार होत असल्याचे सांगितले. शर्मावर भरवसा असल्यामुळे अनेक नागरिक तयार झाले. गुरुदेवनगर येथील मनोज मोटघरे यांनी ४.५० लाख, विनोद मोहाडीकर यांनी ६.५० लाख, सचिन चव्हाण यांनी ४.५० लाख, वैभव निकम यांनी ४.५० लाख, राहुल झाडे यांनी ६.५० लाख, मयुर खिरडकर यांनी ४.५० लाख, दीपक शिंदे आणि नीलेश तांबे यांनी ६.५० लाख रुपये शर्माला दिले. पैसे मिळाल्यानंतर दोन दिवसात दिल्लीवरुन मशीन नागपुरात आणण्याची बतावणी त्याने केली. काही वेळ निघून गेल्यानंतर त्याने ३१ जानेवारीपर्यंत मशीन मिळणार असल्याचे सांगितले. ३१ जानेवारीला नागरिकांनी संपर्क साधला असता त्याने ३ फेब्रुवारीला रात्री १० वाजेपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या पत्त्यावर मशीन पोहोचणार असल्याची माहिती दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून नागरिक परत गेले. ३ फेब्रुवारीला मशीन न आल्यामुळे नागरिक ४ फेब्रुवारीला त्याच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांना शर्मा कार्यालय बंद करून पळून गेल्याचे समजले. त्याचा मोबाईलही बंद होता. कार्यालयातील कर्मचाºयांनीही शर्मा याच्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडित नागरिक एमआयडीसी ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर