शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:34 IST

वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्दे२० आत्महत्या मदतीसाठी पात्र 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढविण्यासोबत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहे. कर्जमाफीही देण्यात आली. त्यानंंतरही शेतकरी आत्महत्या होत आहे. वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.शेतकरी आत्महत्या हा राज्याला आणि त्यातही विदर्भाला लागलेला कलंक समजण्यात येतो. हा कलंक पुसण्यासाठी आतापर्यंत शासनाकडून अनेक उपययोजना करण्यात आल्या. परंतु या योजनांचा किती फायदा होतो, हा प्रश्नच आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचाही फारसा होत असल्याचे दिसत नाही. कर्जमाफीनंतर जवळपास सव्वाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ४४ आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या. वर्ष २०१९ मध्ये ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील २० शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तर ९ प्रकरण प्रलंबित असून १८ प्रकरण मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. मदत निधी वाढीची घोषणा, अंमलबजावणी कधीमदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे एक लाख रुपये देण्यात येते. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकरी आत्महत्या मदतीची रक्कम पाच लाख रुपये करण्याची घोषणा सभागृहात केली होती. मात्र चार वर्ष होत असताना अद्याप त्यात वाढ करण्यात आली नाही, ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येणार हाही प्रश्नच आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर