शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

नागपूर विद्यापीठाला ४४ लाखांचा गंडा, महिला रोखपालाविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: August 30, 2024 23:19 IST

सॉफ्टवेअरमध्ये ४३९ पावत्यांमध्ये केला बदल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिला रोखपालाने विद्यापीठाला ४४ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये तिने ४३९ पावत्या अवैध पद्धतीने अपडेट करत अपहार केला. या प्रकरणात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबिता नितीन मसराम (४०, एसआरपीएफ क्वॉर्टर्स, हिंगणा) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती विद्यापीठात कनिष्ठ लिपिक पदावर असून, कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून कार्य करते. विद्यापीठात कॅश काऊंटरवरील रोखपाल एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करतात. त्यांना युझर आयडी व पासवर्डदेखील देण्यात आला आहे. जर एखादी नोंद चुकली, तर त्याच दिवशी त्यात बदल करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. जर चूक नंतर समोर आली, तर अधिकारी पावती मॉडिफाय करू शकतात. २०२३ मधील एका पावतीमुळे हा भ्रष्टाचार समोर आला. एम. के. बिल्डरने विद्यापीठाच्या अभियंता विभागाच्या मार्फत ३४,१६० रुपयांची पावती सुरक्षा ठेवीच्या रिफंडसाठी जमा केली. वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, मूळ पावती केवळ ४,१६० रुपयांची होती. त्यात बबिता मसरामच्या लॉगिन आयडीवरून २०२२ मध्येच मॉडिफिकेशन झाले होते. याबाबत विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी मसरामला विचारणा केली असता तिने चुकीने मॉडिफिकेशन झाल्याचा दावा केला व ३० हजार रुपये विद्यापीठाच्या खात्यात भरले. मात्र, पालीवाल यांना संशय आला व त्यांनी तिच्या युझर आयडीवरून दिलेल्या पावत्यांची तपासणी केली. त्यात ४३९ तिने मॉडिफाय करत विद्यापीठाला तब्बल ४४ लाख ४० हजारांचा गंडा घातल्याची बाब समोर आली. विद्यापीठाने याची आणखी सखोल चौकशी केली. पालीवाल यांच्या तक्रारीवरून मसरामविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१९ पासून सुरू होता प्रकारबबिता मसरामकडून हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २०१९ ते २०२३ या कालावधीत मसरामने ४३९ पावत्या मॉडिफाय करत अपहार केला. मसरामसोबत इतर कुणी कर्मचारी किंवा अधिकारी यात सहभागी आहेत का याची चौकशी सुरू आहे. मसरामने इतक्या मोठ्या प्रमाणात पावत्या मॉडिफाय केल्यावरदेखील कुणालाही संशय कसा काय आला नाही की, यामागे नियोजनबद्ध पद्धतीने केलेला भ्रष्टाचार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.