शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४१५ बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:58 IST

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोच क्रमांक सीआर १५४३० मध्ये प्लास्टिकचे दोन पोते संशयास्पद स्थितीत आढळले. त्यात मध्य प्रदेशातील दारूच्या ४१५ बॉटल होत्या. परंतु मुंबई ते नागपूर प्रवासात मध्य प्रदेशातील दारू मिळत असलेले कोणतेच गाव नसून मुंबई मार्गे नागपुरात दारू कशी आणली जाईल हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दररोज नागपुरातून वर्धा, चंद्रपूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात दारूची तस्करी होते. पहिल्यांदा दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातून नागपुरात दारू आल्याची घटना घडली आहे.कारवाई आश्चर्यचकित करणारीआयआरसीटीसीच्या वेळापत्रकानुसार सेवाग्राम एक्स्प्रेस नागपुरात पोहोचण्याची वेळ सकाळी ६.१० वाजताची आहे. ही गाडी १.५७ तास उशिराने सकाळी ८.०७ वाजता नागपुरात पोहोचली. आरपीएफने कारवाईची वेळ ८.२० वाजता दाखविली आहे. गाडी येताच १३ मिनिटात आरपीएफचे जवान दारूच्या तस्करीची शक्यताच नसलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोचपर्यंत गेलेच कसे हा प्रश्न आहे. तो पर्यंत गाडीतील प्रवासीच खाली उतरले नसतील. याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ही कारवाई बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा तपास करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी