शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू! यात्रेसाठी एसटीच्या ४,३०० बसेस

By नरेश डोंगरे | Updated: June 29, 2024 20:36 IST

लालपरी चालती पंढरीची वाट : पुण्यातून सर्वाधिक तर मुंबईतून सर्वात कमी बसेसची सेवा

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : लाखो वैष्णवांचा मेळा सामावून घेणारी, राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने तब्बल ४३०० बसेसची व्यवस्था केली आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या राज्यातील गावोगावच्या भाविकांना या बसेस पंढरपूरची वारी घडविणार आहेत.

१३ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत पंढरपूर यात्रा भरणार आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे राज्यासह अन्य राज्यातीलही लाखो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांना नेण्या-आणण्याची सेवा देण्यात कसलीही कसर राहू नये यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या सहाही विभागांना आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे. दर्शनाला निघण्यापासून तो दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्याच विभागात बसेसची कमतरता राहणार नाही, याची खास काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे. प्रसंगी काही ठिकाणी उपरोक्त कालावधीसाठी बसेसचे पूर्वनियोजन करून ठेवले असेल तर ते रद्द करावे, असेही सांगण्यात आले आहे.

बसेस स्वच्छ आणि टापटीप असतील, त्या अगदी वेळेवर भाविकांच्या सेवेत राहतील, यासंबंधीची आगाऊ खबरदारी घेण्याचे निर्देशही महामंडळाच्या महाव्यस्थापकांनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना आणि राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहे.रिंगण वाहतूकीसाठी नागपूर, अमरावतीचे नियोजन

सोमवारी १५ जुलैला वाखरी (बाजीराव विहिर) येथे माऊलीचे रिंगण राहणार असून त्यासाठी चंद्रभागा बसस्थानकावरून भाविक मोठ्या संख्येत वाखरीला रिंगणाकरिता जाण्याचे संकेत आहेत. परिणामी या दिवशी मोठ्या संख्येत बसेसची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार, नागपूर आणि अमरावती विभागातून जास्तीत जास्त बसेस पाठविण्यात याव्यात, असे निर्देश या दोन्ही विभागाच्या प्रमूखांना देण्यात आले आहे.सर्वाधिक बसेस पुणे, छ. संभाजीनगरातून

विठूरायाच्या पंढरपूर वारीसाठी सर्वाधिक ११५० बसेसची व्यवस्था पुणे विभागातून करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातून १०५० बसेस, नाशिक ९५० बसेस, अमरावती ७०० बसेस, नागपूर २५० बसेस तर मुंबई विभागातून २०० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.बसस्थानके आणि विभागातील बसेसचे संचालन

प्रवाशांना येण्याजाण्यासाठी सोयीचे व्हावे आणि बसचालक, वाहकांनाही अडचण होऊ नये म्हणून राज्यातील बसेसच्या संचालनाचे वेगवेगळ्या बसस्थानकांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र चार बस स्थानकांची व्यवस्था करण्या आली आहे. त्यानुसार, चंद्रभागा बसस्थानकात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सातारा, पुणे आणि पंढरपूर आगाराच्या बसेस थांबणार आहेत. भिमा यात्रा देगाव बसस्थानकात छ. संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीच्या बसेस थांबतील. विठ्ठल कारखाना बसस्थानकात नाशिक विभागातील तसेच पांडूरंग बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग विभागाच्या बसेसचे संचालन होणार आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीstate transportएसटी