शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

स्मार्ट सिटीचा ३७ टक्के निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

प्रकल्पाचे भवितव्य संकटात : मार्च २०२२ पर्यंत खर्च न झाल्यास पुढील निधीवर प्रश्नचिन्ह गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क ...

प्रकल्पाचे भवितव्य संकटात : मार्च २०२२ पर्यंत खर्च न झाल्यास पुढील निधीवर प्रश्नचिन्ह

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सन २०१६ साली मोठा गाजावाजा करून केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेची घोषणा झाली. पाच वर्षांत गतिमान विकासाची अपेक्षा होती. यात नागपूर शहराचाही समावेश होता. परंतु या कालावधीत प्राप्त झालेल्या ४७५.८५ कोटीपैकी २९७.४९ कोटींचा निधी खर्च झाला, म्हणजेच ३७ टक्के निधी अखर्चित आहे. मार्च २०२२ पर्यंत नासुप्रला आपल्या वाट्याचा निधी द्यावयाचा असून, हा निधी खर्च न झाल्यास केंद्र व राज्य सरकारकडून पुढील टप्प्यातील निधी प्राप्त होणार नसल्याने स्मार्ट सिटीचे भवितव्य संकटात आहे.

विशेष म्हणजे मार्च २०२२ पर्यंत मनपा व नासुप्रला या प्रकल्पात १५० कोटींचा निधी द्यावयाचा आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून नासुप्रवर या निधीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नासुप्रने आजवर १०० कोटीचा निधी दिला आहे. केंद्र शासनाने स्मार्ट सिटीसाठी १०० शहरांची निवड केली होती. प्रत्येक शहराला ५०० कोटी तर राज्य आणि स्थानिक शहरांनी ५०० कोटी अशी प्रत्येकी १००० कोटी रुपये तरतूद केली होती.

केंद्र सरकारकडून नागपूर शहराला २१७.२३ कोटी, राज्य सरकारकडून १०८.६२ कोटी तर, नियोजन प्राधिकरण म्हणून नासुप्रचा १०० कोटींचा यात वाटा आहे. यातील केंद्र सरकारकडून प्राप्त २१७.२३ कोटी संपूर्ण खर्च करण्यात आले. राज्य सरकारच्या १०८.६२ कोटीपैकी ७३.५३ कोटी खर्च करण्यात आले. नासुप्रकडून प्राप्त १०० कोटीपैकी ६.७३ कोटी खर्च करण्यात आले.

स्मार्ट सिटी प्रकल्पात ६५० कोटीच्या प्रोजेक्ट टेंडरशुअर व होम स्वीटी होम या २२२.०९ कोटींच्या प्रकल्पाचा समावेश आहे. एक हजार कोटीपैकी फक्त ४७५.८५ कोटीचा निधी प्राप्त झाला. त्यातील १७८.१६ कोटी खर्च झालेले नाही. कोविड संकटामुळे निधी खर्च करता आला नाही, असा दावा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

. ...............

स्मार्ट सिटी प्रकल्पात वाटा प्राप्त निधी झालेला खर्च (कोटी)

केंद्र सरकार २१७.२३ २१७.२३

राज्य सरकार १०८.६२ ७३.५३

मनपा व नासुप्र १५० ६.७३

एकूण ४७५.८५ २९७.४९

.....

स्मार्ट सिटीसाठी मंजूर निधी -१०००

केंद्र सरकारचा वाटा -५००

राज्य सरकार -२५०

मनपा व नासुप्र -२५०

..............

दोनदा मुदतवाढ पण गती नाही

६५० कोटीच्या प्रोजेक्ट टेंडरशुअर प्रकल्पाचा १ लाख १३ हजार लोकांना फायदा होणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा एकात्मिक पद्धतीने मिळतील. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. परिसरात २४ बाय ७ पाणीपुरवठा व परिसरात कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन होणार आहे. ५२ किलोमीरचे रस्ते, २९ पुलांचे निर्माण, ७ हजार एलईडी पथदिवे, मलनिस्सारण, आदींचा समावेश आहे. हा प्रकल्प ९ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्याने आधी ३१ मार्च २०२१ व नंतर ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

....

नागरिकांना दाखविलेली स्वप्ने कागदावरच

स्मार्ट सिटीच्या नावाखाली नागपूरकरांना दाखविलेली स्वप्ने कागदावरच राहिली. या प्रकल्पाबाबत नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही. नागरिकांच्या हातात फारसे काही लागलेले नाही. केवळ वर्षभराच्या मुदतवाढीच्या काळात उर्वरित प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यताही नाही. ५२ किलोमीटरचे रस्ते, इंटिग्रेटेड रोड, पाणीपुरवठा, सिवरेज, पावसाळी नाल्या, पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी भागाचा विकास, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, उड्डाणपूल, स्मार्ट बस शेल्टर, शेअर बाईक, ई-रिक्षा, ऑटोमोटेड एमएलसी आदींचा समावेश आहे.