शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

नागपुरात आज ३.५ लाख नळ राहणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:23 IST

१७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देटँकरही चालणार नाही : संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : १७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.पावसाने दडी मारल्यामुळे शहरात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तोतलाडोह कोरडा पडला असून नवेगाव-खैरीमध्ये नाममात्र पाणी शिल्लक आहे. अशी भीषण परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेमध्ये मंगळवारीही बैठक घेण्यात आली. दरम्यान, बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयावर सखोल चर्चा करण्यात आली. पाण्याच्या मोठ्या ग्राहकांसंदर्भात धोरण तयार करण्याची मनपाची योजना आहे. कन्हानमध्ये पाण्याचा स्तर चांगला आहे. त्यामुळे नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा करण्याचा विचार बोलून दाखवण्यात आला. परंतु, हा विचार प्रत्यक्षात उतरतो की नाही हे बुधवारीच स्पष्ट होणार आहे. पाणी पुरवठ्याचे पुढील नियोजन पावसावर अवलंबून आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत बुधवारनंतर शुक्रवारी (१९ जुलै) व रविवारी (२१ जुलै) पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.तर पाईप लाईनमध्ये दूषित पाणीशहरात २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेंतर्गत जुनी पाईप लाईन बदलवून नवीन पाईप लाईन टाकली जात आहे. आतापर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. ६६ टक्के पाईप लाईन अद्यापही जुनी आहे. त्या पाईप लाईनमध्ये लिकेज आहेत. पाणी पुरवठा बंदच्या काळात त्या पाईप लाईनमध्ये दूषित पाणी शिरू शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना दूषित पाणी मिळू शकते. पाईप लाईन चार्ज असते त्यावेळी त्यात दूषित पाणी शिरत नाही.विहिरी व बोअरवेलचा वापर वाढेलमनपाच्या पाणी कपातीमुळे नागरिक विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग वाढवू शकतात. मनपाने शहरातील ७५५ पैकी ४४१ विहिरींची सफाई केली आहे. ३१४ विहिरी दूषित आहेत. शहरात ५२५४ जुन्या बोअरवेल असून २७७ नवीन बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. पूर्व, उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरमधील वस्त्या बोअरवेलवर अवलंबून आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका