शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

नागपुरात आज ३.५ लाख नळ राहणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:23 IST

१७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देटँकरही चालणार नाही : संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : १७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.पावसाने दडी मारल्यामुळे शहरात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तोतलाडोह कोरडा पडला असून नवेगाव-खैरीमध्ये नाममात्र पाणी शिल्लक आहे. अशी भीषण परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेमध्ये मंगळवारीही बैठक घेण्यात आली. दरम्यान, बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयावर सखोल चर्चा करण्यात आली. पाण्याच्या मोठ्या ग्राहकांसंदर्भात धोरण तयार करण्याची मनपाची योजना आहे. कन्हानमध्ये पाण्याचा स्तर चांगला आहे. त्यामुळे नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा करण्याचा विचार बोलून दाखवण्यात आला. परंतु, हा विचार प्रत्यक्षात उतरतो की नाही हे बुधवारीच स्पष्ट होणार आहे. पाणी पुरवठ्याचे पुढील नियोजन पावसावर अवलंबून आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत बुधवारनंतर शुक्रवारी (१९ जुलै) व रविवारी (२१ जुलै) पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.तर पाईप लाईनमध्ये दूषित पाणीशहरात २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेंतर्गत जुनी पाईप लाईन बदलवून नवीन पाईप लाईन टाकली जात आहे. आतापर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. ६६ टक्के पाईप लाईन अद्यापही जुनी आहे. त्या पाईप लाईनमध्ये लिकेज आहेत. पाणी पुरवठा बंदच्या काळात त्या पाईप लाईनमध्ये दूषित पाणी शिरू शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना दूषित पाणी मिळू शकते. पाईप लाईन चार्ज असते त्यावेळी त्यात दूषित पाणी शिरत नाही.विहिरी व बोअरवेलचा वापर वाढेलमनपाच्या पाणी कपातीमुळे नागरिक विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग वाढवू शकतात. मनपाने शहरातील ७५५ पैकी ४४१ विहिरींची सफाई केली आहे. ३१४ विहिरी दूषित आहेत. शहरात ५२५४ जुन्या बोअरवेल असून २७७ नवीन बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. पूर्व, उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरमधील वस्त्या बोअरवेलवर अवलंबून आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका