शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुफी फंडच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने तब्बल ३४२ लोकांना घातला गंडा

By योगेश पांडे | Updated: December 6, 2022 16:52 IST

फसवणुकीचा गुन्हा दाखल

नागपूर : गुंतवणूकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका दांपत्याने थोड्याथोडक्या नव्हे तर ३४२ लोकांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्राथमिक तपासानंतर या ‘बंटी-बबली’ने लोकांची ६० लाखांची फसवणूक केल्याचा आकडा निघाला आहे. मात्र ही रक्कम कोटींमध्ये जाऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

अशोकनगर, सिद्धी कॉलनी येथे राहणारे जितेंद्रनाथ उर्फ जितू लल्लुराम गुप्ता (४४) व त्याची पत्नी अंजना उर्फ अंजू (३८) अशी आरोपींची नावे आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी नागरिकांना फंडच्या जाळ्यात अडकवायची योजना आखली. त्यांनी सुफी फंड या नावाने गुंतवणूक योजना तयार केली. यात दैनंदिन तसेच इतर गुंतवणूकीचे पर्याय होते. त्यांनी अगोदर पाचपावलीतील अशोकनगरातील गोंड मोहल्ल्यात कार्यालय थाटले. त्यानंतर शहरातील विविध भागातील नागरिकांनी संपर्क केला व बॅंकांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल असे आमिष दाखविले.

त्यांनी विविध माध्यमांतून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले व ३४२ लोकांकडून ६० लाख ६७ हजार रुपये गोळा केले. मात्र रकमेचा परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विविध कारणे सांगण्यास सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी काही काळ संयम दाखविला. मात्र त्यानंतर परत गुंतवणूकदार गेले असता पती-पत्नीने अश्लिल शिवीगाळ करत धमकी देण्यास सुरुवात केली.

नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत त्यांनी लोकांकडून पैसे उकळले. यासंदर्भात महेश लोटनप्रसाद गुप्ता (५१) यांनी पोलिसांत तक्रार केली. पाचपावली ठाण्यातील पथकाने प्राथमिक चौकशी करून गुप्ता दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जितू गुप्ताला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर