शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

शंभर टक्के विद्युतीकरणामुळे रेल्वेची वर्षाला ३४२ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 22:34 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.

ठळक मुद्दे१.०५ लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत प्रदुषणातही होणार घट

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना प्रसाद म्हणाले की, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ९७० रूट किमी आणि २,३३२ ट्रॅक किमीचे ब्रॉडगेज मार्ग आहेत. विभागाची एकूण स्थापित ट्रॅक्शन वीज पुरवठा क्षमता ७५४ (एमव्हीए) आहे. ज्यात १७ ट्रॅक्शन सब स्टेशनचा समावेश आहे. इटारसी - नागपूर, नागपूर - बडनेरा, सेवाग्राम - बल्लारशाह, आमला - छिंदवाडा, नरखेड - चांदूर बाजार आणि वणी - पिंपळखुटी सेक्शनमधील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. वणी - पिंपळखुटी दरम्यान सुमारे ६७ रूट किमीच्या अंतिम टप्प्याचे विद्युतीकरणानंतर नागपूर विभागाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

या विद्युतीकरणातून रेल्वेने वाहतुकीची पर्यावरणपूरक पद्धत निश्चित केली. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाले असून देशाच्या परकीय चलनाचीही बचत होणार आहे. याशिवाय ट्रॅक्शन बदलांमुळे होणारा अडथळा टळून क्षमताही वाढली आहे. या एकूणच स्थितीमुळे वार्षिक इंधन बिलात सुमारे ३४२ कोटींची बचत होणार आहे. त्याबरोबरच वार्षिक सुमारे १.०५ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याचे साैरभ प्रसाद यांनी सांगितले.

२०३० पूर्वी “नेट झिरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरू असून रेल्वेला पर्यावरणपूरक, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. यावेळी अपर रेल्वे व्यवस्थापक पी. एस. खैरकर, रुपेश चांदेकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, विद्युत अभियंता अमित गुप्ता, राजेश चिखले, विजय थूल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

वर्ल्ड क्लासच्या कामासाठी समन्वयावर भर

नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाचा पुनर्विकासाचे (वर्ल्ड क्लास स्टेशन) काम ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरण, मध्य रेल्वे, बांधकाम विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात त्यासाठी बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

अजनीच्या केबल पुलाला लवकरच मंजूरी

महापालिका आणि महारेल्वे तर्फे अजनीत बनविण्यात येणाऱ्या केबल आधारित पुलाच्या ड्राईंगला मध्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाकडून लवकरच मंजुरी प्रदान केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

प्रवाशांना त्रास होणार नाही

नागपूर - मुंबई दुरंतो एक्सप्रेसच्या स्लिपर कोचची संख्या कमी करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे प्रसाद म्हणाले.

------

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे