शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

शंभर टक्के विद्युतीकरणामुळे रेल्वेची वर्षाला ३४२ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 22:34 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.

ठळक मुद्दे१.०५ लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत प्रदुषणातही होणार घट

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना प्रसाद म्हणाले की, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ९७० रूट किमी आणि २,३३२ ट्रॅक किमीचे ब्रॉडगेज मार्ग आहेत. विभागाची एकूण स्थापित ट्रॅक्शन वीज पुरवठा क्षमता ७५४ (एमव्हीए) आहे. ज्यात १७ ट्रॅक्शन सब स्टेशनचा समावेश आहे. इटारसी - नागपूर, नागपूर - बडनेरा, सेवाग्राम - बल्लारशाह, आमला - छिंदवाडा, नरखेड - चांदूर बाजार आणि वणी - पिंपळखुटी सेक्शनमधील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. वणी - पिंपळखुटी दरम्यान सुमारे ६७ रूट किमीच्या अंतिम टप्प्याचे विद्युतीकरणानंतर नागपूर विभागाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

या विद्युतीकरणातून रेल्वेने वाहतुकीची पर्यावरणपूरक पद्धत निश्चित केली. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाले असून देशाच्या परकीय चलनाचीही बचत होणार आहे. याशिवाय ट्रॅक्शन बदलांमुळे होणारा अडथळा टळून क्षमताही वाढली आहे. या एकूणच स्थितीमुळे वार्षिक इंधन बिलात सुमारे ३४२ कोटींची बचत होणार आहे. त्याबरोबरच वार्षिक सुमारे १.०५ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याचे साैरभ प्रसाद यांनी सांगितले.

२०३० पूर्वी “नेट झिरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरू असून रेल्वेला पर्यावरणपूरक, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. यावेळी अपर रेल्वे व्यवस्थापक पी. एस. खैरकर, रुपेश चांदेकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, विद्युत अभियंता अमित गुप्ता, राजेश चिखले, विजय थूल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

वर्ल्ड क्लासच्या कामासाठी समन्वयावर भर

नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाचा पुनर्विकासाचे (वर्ल्ड क्लास स्टेशन) काम ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरण, मध्य रेल्वे, बांधकाम विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात त्यासाठी बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

अजनीच्या केबल पुलाला लवकरच मंजूरी

महापालिका आणि महारेल्वे तर्फे अजनीत बनविण्यात येणाऱ्या केबल आधारित पुलाच्या ड्राईंगला मध्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाकडून लवकरच मंजुरी प्रदान केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

प्रवाशांना त्रास होणार नाही

नागपूर - मुंबई दुरंतो एक्सप्रेसच्या स्लिपर कोचची संख्या कमी करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे प्रसाद म्हणाले.

------

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे