शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

३३ टक्क्याचा निकष गारपीटग्रस्तांना लागू होईल?

By admin | Updated: April 10, 2015 02:19 IST

३३ टक्क्यांपर्यंत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत केली जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा लाभ मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या पीकहानीसाठी दिला जाईल का?

नागपूर : ३३ टक्क्यांपर्यंत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत केली जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा लाभ मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या पीकहानीसाठी दिला जाईल का? अशी विचारणा केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत काहीही सांगता येणार नाही. केंद्राचे आदेश आल्यावरच याबाबत स्पष्टता येईल, असे महसूल खात्याचे म्हणणे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीकहानी झाली असेल तर त्यासाठी केंद्राचे निकष ठरले आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त हानी झाली असेल तरच केंद्राच्या मदतीसाठी पात्र ठरते. त्यानुसार कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर ४५०० तर ओलितासाठी प्रति हेक्टर ९००० मदत केली जाते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीकहानी ३३ टक्के झाली असेल तरी केंद्राकडून मदत मिळेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे याचा फायदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या पीकहानीसाठी मिळेल का, याबाबत विचारणा होत आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील पिकांची ५० टक्क्यांपेक्षा जास्त हानी झाली आहे. याबाबत महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप याबाबत अधिकृतरीत्या काहीही बोलण्यास नकार दिला. पंतप्रधानांनी घोषणा केली असली तरी त्याचे आदेश जारी होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होण्यास किमान एक ते दीड महिन्याचा वेळ लागू शकतो. त्यातील निकष काय असतील यावरच पुढच्या बाबी अवलंबून आहे. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसाठी जरी केंद्राचे आदेश लागू झाले तर नव्याने पंचनामे करावे लागतील व त्यासाठीही काही वेळ लागणार आहे. कारण सध्या महसूल यंत्रणा ५० टक्क्यांपेक्षा कमी पीकहानीची नोंद घेत नाही.सलग तीन वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त हानी झाली तरच मदत मिळणार, हा निकष शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ३३ टक्क्यांपर्यंत हानी झाली तरी मदत करण्याची केलेली घोषणा त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केव्हा होते, यावरच सर्व अवलंबून आहे. (प्रतिनिधी)