शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

३३ टक्क्याचा निकष गारपीटग्रस्तांना लागू होईल?

By admin | Updated: April 10, 2015 02:19 IST

३३ टक्क्यांपर्यंत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत केली जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा लाभ मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या पीकहानीसाठी दिला जाईल का?

नागपूर : ३३ टक्क्यांपर्यंत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत केली जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा लाभ मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या पीकहानीसाठी दिला जाईल का? अशी विचारणा केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत काहीही सांगता येणार नाही. केंद्राचे आदेश आल्यावरच याबाबत स्पष्टता येईल, असे महसूल खात्याचे म्हणणे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीकहानी झाली असेल तर त्यासाठी केंद्राचे निकष ठरले आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त हानी झाली असेल तरच केंद्राच्या मदतीसाठी पात्र ठरते. त्यानुसार कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर ४५०० तर ओलितासाठी प्रति हेक्टर ९००० मदत केली जाते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीकहानी ३३ टक्के झाली असेल तरी केंद्राकडून मदत मिळेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे याचा फायदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या पीकहानीसाठी मिळेल का, याबाबत विचारणा होत आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील पिकांची ५० टक्क्यांपेक्षा जास्त हानी झाली आहे. याबाबत महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप याबाबत अधिकृतरीत्या काहीही बोलण्यास नकार दिला. पंतप्रधानांनी घोषणा केली असली तरी त्याचे आदेश जारी होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होण्यास किमान एक ते दीड महिन्याचा वेळ लागू शकतो. त्यातील निकष काय असतील यावरच पुढच्या बाबी अवलंबून आहे. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसाठी जरी केंद्राचे आदेश लागू झाले तर नव्याने पंचनामे करावे लागतील व त्यासाठीही काही वेळ लागणार आहे. कारण सध्या महसूल यंत्रणा ५० टक्क्यांपेक्षा कमी पीकहानीची नोंद घेत नाही.सलग तीन वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त हानी झाली तरच मदत मिळणार, हा निकष शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ३३ टक्क्यांपर्यंत हानी झाली तरी मदत करण्याची केलेली घोषणा त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केव्हा होते, यावरच सर्व अवलंबून आहे. (प्रतिनिधी)