नागरी उड्डयन मंत्रालयाला ३,२२४ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:00+5:302021-02-05T04:50:00+5:30
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचे काम २०२१-२२ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय ...

नागरी उड्डयन मंत्रालयाला ३,२२४ कोटींची तरतूद
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचे काम २०२१-२२ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. एअर इंडिया सध्या विनिवेश प्रक्रियेत आहे. मागील महिन्यात एकाधिक संस्थांनी वाहकांसाठी त्यांच्या आवडीची अभिव्यक्ती (ईओआय) सादर केली. येत्या आठवड्यात सरकार पात्र निविदाकारांची नावे जाहीर करणार आहे.
कर्जबाजारी असलेल्या राष्ट्रीय वाहकांच्या आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून एअर इंडिया अॅसेट असोसिएट होल्डिंग लिमिटेड हे एक विशेष हेतू व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षात एसपीव्हीसाठी २,२६८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. एअर इंडिया आणि पवनहंस यांचीही निर्गुंतवणूक २०२२-२२ मध्ये पूर्ण होईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पात नागरी उड्डयन मंत्रालयाला ३,३३४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ते चालू आर्थिक वर्षांसाठी ४,१३१ कोटी रुपयांपेक्षा २२ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंत्रालयाला २०२०-२१ साठी ३,७९७ कोटी रुपये देण्यात आले होते.