३१६७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

By Admin | Updated: August 22, 2016 02:51 IST2016-08-22T02:51:40+5:302016-08-22T02:51:40+5:30

महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या

3167 project seekers wait for job | ३१६७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

३१६७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

५७०८ प्रकल्पग्रस्तांना मिळाला हक्क : चंद्रपूरमध्ये सर्वाधिक संधी
नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या प्रकल्पाकरिता ज्या लोकांची जमीन संपादित करण्यात आली त्या एकूण ८८७५ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी ३० जून २०१६ पर्यंत ५७०८ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मितीने नोकरीत समावून घेतले आहे. यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सामावून घेण्यात आले आहे. ३१६७ प्रकल्पग्रस्त अजूनही प्रतीक्षेत आहेत.
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती विचारली होती. महानिर्मितीने त्यांना यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे. महानिर्मितीनीच्या चंद्रपूर येथील वीज केंद्रात सर्वाधिक २६६९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. चंद्रपूर येथे एकूबण ३४०६ प्रकल्पग्रस्त होते. त्यापैकी ७३७ प्रकल्पग्रस्तांना अजूनही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यानंतर कोराडी येथील वीज केंद्रात १८९८ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आले. १५२ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. भुसावळ येथे ६६४ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले, ६९६ प्रतीक्षेत, नाशिक येथे ३६५ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले. १२२७ प्रतीक्षेत आहेत. खापरखेडा येथे ७५ व पारस येथे ३९ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले असून अनुक्रमे ११० व २४५ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत.
याशिवाय पारस येथील दोन प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी एकमुश्त ५ लाख रुपये प्रदान करण्यात आले. ज्या उमेदवारांना तांत्रिक अर्हता किंवा इतर कारणांमुळे सामावून घेता आले नाही, अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआयचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी दोन हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाते. ज्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळत नाही, अशा उमेदवारांना पोफळी जल विद्युत केंद्र नाशिक व भुसावळ विद्युत केंद्राच्या आवारात मुलभूत व अनुषांगिक सूचना केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात उमेदवारांना प्रथम दोन वर्षाकरिता दोन हजार रुपये दरमहा व तिसऱ्या वर्षाकरिता सहा हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जते. तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणावर सामावून घेण्यात येते. तेव्हा त्यांना आठ हजार रुपये दरमहा इतके विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी ३० जून व ३१ डिसेंबर या दिवशी तीन वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. (प्रतिनिधी)

Web Title: 3167 project seekers wait for job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.