शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३० आदिवासी जमाती यादीतून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:53 IST

Nagpur News १९८५ च्या अध्यादेशात काही जमाती नामसदृश्याचा फायदा घेत असल्याचे कारण देऊन त्यांना आदिवासींच्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या. यात गोवारी, माना, कोष्टी, तडवी भिल्ल, गाबीत, धनगर, भुजवा, भोयर (पोवार), भाईना, धोबी, मन्नुरवार, नगारसी, नागवंशी अशा जमातीचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१९८५ च्या अध्यादेशाचा सहा लाख आदिवासींना फटका

 

मंगेश व्यवहारे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १९८५ मध्ये राज्य सरकारने एक अध्यादेश काढला. त्या अध्यादेशात राज्य म्हणाले की, आदिवासींच्या काही जमाती नामसादृष्याचा वापर करून गैरफायदा घेत आहे. या अध्यादेशाचा फटका राज्यातील सहा लाख आदिवासींना बसला. अनुसूचित जमातीचे त्यांचे हक्क डावलण्यात आले. अजूनही यातील काही जमातीचा संघर्ष सुरू आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात सह्यांद्रीच्या पठारात, सातपुड्याच्या जंगलात व गोंडवाना ग्रुपमध्ये आदिवासी जमात आढळायची. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये ४७ ग्रुप म्हणजे १९२ जमाती होत्या. स्वातंत्र्यानंतरही त्यांना अनुसूचित जमातीचे संरक्षण मिळत होते. पण, १९८५ च्या अध्यादेशात काही जमाती नामसदृश्याचा फायदा घेत असल्याचे कारण देऊन त्यांना आदिवासींच्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या. यात गोवारी, माना, कोष्टी, तडवी भिल्ल, गाबीत, धनगर, भुजवा, भोयर (पोवार), भाईना, धोबी, मन्नुरवार, नगारसी, नागवंशी अशा जमातीचा समावेश आहे.

या अध्यादेशाला दुसऱ्या समाजाच्या मागण्यांचा आणि घोळाचाही संदर्भ आहेच. जसं की कोष्टी समाजातल्या काही लोकांनी स्वत:ला हलबा-कोष्टी म्हणत, अशा कुठल्याही अस्तित्वात नसलेल्या आदिवासी जमातीत समाविष्ट करून घेतलं आणि सवलतींचा लाभ घेतला. मूळ जमात हलबा किंवा हलबी अशी आहे, पण हलबा-कोष्टी अशी जमात नाही. गोवारीसुद्धा स्वत:ला गोंड-गोवारी असं संबोधूनच गैरफायदा घेत आहेत, असं सरकारचं मत होतं. या अध्यादेशानंतर सरकारला गोवारी समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागले. यात १९९४ मध्ये ११४ गोवारींना बलिदान द्यावे लागले. माना जमातीच्या विरोधात राज्य सरकारला तर वारंवार हार पत्कारावी लागली; पण काही जमातीने संघर्ष केला नाही.

- ११४ गोवारी शहीद झाल्यानंतर युती शासनाने गोवारींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश केला. २०१६ मध्ये केंद्र शासनाने ओबीसीत टाकले. १४ ऑगस्ट २०१८ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी आदिवासीच आहे असा निर्णय दिला. परंतु, राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पण शासनाच्या १९५० पूर्वीच्या महसुली पुराव्यात गोंडगोवारी ही जात अस्तित्वातच नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आदिवासींचे आमचे हक्क नाकारले गेले आहे.

कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना

- १९८५ च्या अध्यादेशात माना जमातीलाही वगळण्यात आले होते. आम्ही २००२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या अध्यादेशाला आव्हान दिले. न्यायालयाने मानांच्या बाजूने निर्णय दिला. महाराष्ट्र शासनाने त्या विरोधात २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली; पण सर्वोच्च न्यायालयाने ती खारीज केली. त्यानंतर शासनाने रिव्ह्यूव्ह पीटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. पण, न्यायालयाने शासनाच्या याचिका खारीज केला. मानांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांना आदिवासींचे अधिकार मिळाले.

अ‍ॅड. नारायण जांभूळे, मुख्य संघटक, आदिवासी माना समाज क्रांती समिती

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना