शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

राज्यातील ३० आदिवासी जमाती यादीतून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:53 IST

Nagpur News १९८५ च्या अध्यादेशात काही जमाती नामसदृश्याचा फायदा घेत असल्याचे कारण देऊन त्यांना आदिवासींच्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या. यात गोवारी, माना, कोष्टी, तडवी भिल्ल, गाबीत, धनगर, भुजवा, भोयर (पोवार), भाईना, धोबी, मन्नुरवार, नगारसी, नागवंशी अशा जमातीचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१९८५ च्या अध्यादेशाचा सहा लाख आदिवासींना फटका

 

मंगेश व्यवहारे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १९८५ मध्ये राज्य सरकारने एक अध्यादेश काढला. त्या अध्यादेशात राज्य म्हणाले की, आदिवासींच्या काही जमाती नामसादृष्याचा वापर करून गैरफायदा घेत आहे. या अध्यादेशाचा फटका राज्यातील सहा लाख आदिवासींना बसला. अनुसूचित जमातीचे त्यांचे हक्क डावलण्यात आले. अजूनही यातील काही जमातीचा संघर्ष सुरू आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात सह्यांद्रीच्या पठारात, सातपुड्याच्या जंगलात व गोंडवाना ग्रुपमध्ये आदिवासी जमात आढळायची. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये ४७ ग्रुप म्हणजे १९२ जमाती होत्या. स्वातंत्र्यानंतरही त्यांना अनुसूचित जमातीचे संरक्षण मिळत होते. पण, १९८५ च्या अध्यादेशात काही जमाती नामसदृश्याचा फायदा घेत असल्याचे कारण देऊन त्यांना आदिवासींच्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या. यात गोवारी, माना, कोष्टी, तडवी भिल्ल, गाबीत, धनगर, भुजवा, भोयर (पोवार), भाईना, धोबी, मन्नुरवार, नगारसी, नागवंशी अशा जमातीचा समावेश आहे.

या अध्यादेशाला दुसऱ्या समाजाच्या मागण्यांचा आणि घोळाचाही संदर्भ आहेच. जसं की कोष्टी समाजातल्या काही लोकांनी स्वत:ला हलबा-कोष्टी म्हणत, अशा कुठल्याही अस्तित्वात नसलेल्या आदिवासी जमातीत समाविष्ट करून घेतलं आणि सवलतींचा लाभ घेतला. मूळ जमात हलबा किंवा हलबी अशी आहे, पण हलबा-कोष्टी अशी जमात नाही. गोवारीसुद्धा स्वत:ला गोंड-गोवारी असं संबोधूनच गैरफायदा घेत आहेत, असं सरकारचं मत होतं. या अध्यादेशानंतर सरकारला गोवारी समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागले. यात १९९४ मध्ये ११४ गोवारींना बलिदान द्यावे लागले. माना जमातीच्या विरोधात राज्य सरकारला तर वारंवार हार पत्कारावी लागली; पण काही जमातीने संघर्ष केला नाही.

- ११४ गोवारी शहीद झाल्यानंतर युती शासनाने गोवारींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश केला. २०१६ मध्ये केंद्र शासनाने ओबीसीत टाकले. १४ ऑगस्ट २०१८ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी आदिवासीच आहे असा निर्णय दिला. परंतु, राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पण शासनाच्या १९५० पूर्वीच्या महसुली पुराव्यात गोंडगोवारी ही जात अस्तित्वातच नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आदिवासींचे आमचे हक्क नाकारले गेले आहे.

कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना

- १९८५ च्या अध्यादेशात माना जमातीलाही वगळण्यात आले होते. आम्ही २००२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या अध्यादेशाला आव्हान दिले. न्यायालयाने मानांच्या बाजूने निर्णय दिला. महाराष्ट्र शासनाने त्या विरोधात २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली; पण सर्वोच्च न्यायालयाने ती खारीज केली. त्यानंतर शासनाने रिव्ह्यूव्ह पीटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. पण, न्यायालयाने शासनाच्या याचिका खारीज केला. मानांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांना आदिवासींचे अधिकार मिळाले.

अ‍ॅड. नारायण जांभूळे, मुख्य संघटक, आदिवासी माना समाज क्रांती समिती

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना