शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात १० महिन्यात २९ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 19:36 IST

जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्त कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांची केली तीन महिन्यात आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाय करण्यात येत आहेत. त्यांना जोडधंदा करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कर्जमाफीचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. नापिकीमुळे शेतकरी गंभीर चिंतित झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या जानेवारीपासून आॅक्टोबर महिन्यापर्यंत २९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. यातील १९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर फक्त सहाच प्रकरणे मदतीस प्राप्त ठरविण्यात आली. चार प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रशासनाचे शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यावर विशेष भर असल्याचे दिसते. पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली आहे. काटोल, कळमेश्वर आणि नरखेड या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. अलीकडच्या काळात नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर