शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 10:42 IST

चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देविदर्भातील बेरोजगारांना लाखोंचा गंडासरकारी कर्मचाऱ्याचाही आरोपी म्हणून सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :रेल्वेत तिकीट चेकरची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो तरुणांची एका टोळीने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला.

विजय मारोतराव साखरकर (२७, आराधनानगर) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सुरेंद्र तेलंग (५२, सीताबर्डी) आणि त्याचा पश्चिम बंगाल येथील साथीदार दिनेश प्रसाद या दोघांनी रेल्वेत तिकीट चेकरची (टीसी)ची नोकरी लावून देण्याचे २०१५ मध्ये आमिष दाखविले. विजयकडून त्यासाठी ८ लाख, ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर, अशाच प्रकारे चंद्रपुरातील तिघांकडून १९ लाख, ५० हजार घेतले. या चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर, या चौघांनी आरोपी तेलंगची गचांडी धरली. तो केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एका कार्यालयात नोकरी करतो. पोलीस कारवाईचा त्याला धाक दाखविल्यानंतर त्याने रक्कम परत करतो, असे सांगून ३० जून, २०१९ला काही धनादेश दिले. मात्र, खात्यात रक्कम नसल्याने ते वटलेच नाही. तेव्हापासून रक्कम मिळावी, म्हणून आरोपींकडे साखरकरसह अन्य तरुण तगादा लावून होते. तो रक्कम परत करणार नाही, अशी खात्री पटल्याने, अखेर त्यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदविली. द्वितीय पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, गुरुवारी रात्री तेलंग आणि प्रसाद या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

ओसाड ठिकाणी पाच महिने प्रशिक्षण

पीडित तरुणांच्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतर, त्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली कोलकाताजवळच्या एका गावातील ओसाड इमारतीत तब्बल पाच महिने ठेवले. यात साखरकर आणि चंद्रपुरातील तीन असे चार जण व देशाच्या इतर भागातील २० तरुण होते. त्यांना तेथे खाण्या-पिण्याचीही सोय नव्हती. जे खायचे, प्यायचे आहे, ते तुम्हीच आणा आणि तुम्हीच खा, असे सांगितले जायचे. कधीतरी एखादी ट्रेन यायची अन् हे तरुण टीसी म्हणून बाहेरूनच कर्तव्य कसे बजावायचे, त्याचे प्रात्यक्षिक करायचे.

फसवणूक झालेला तरुण पोलिसाचा मुलगा

या टोळीने देशभरातील अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, नागपुरात दोन वर्षांपूर्वी असाच एक गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळीही अशाच पद्धतीने तरुणांची फसवणूक झाली होती. रेल्वेत अशी नोकरी मिळत नाही, हे माहिती असूनही बेरोजगार तरुण लाखो रुपये दुसऱ्यांच्या हातात घालून फसवणूक करून घेतात. या प्रकरणातील तक्रारदार विजय हा निवृत्त पोलीस कर्मचारी मारोतराव साखरकर यांचा मुलगा होय, तर केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीला असूनही अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सहभागी झालेला तेलंग हा नागपुरातील पहिलाच आरोपी असावा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेjobनोकरीfraudधोकेबाजी