शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 10:42 IST

चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देविदर्भातील बेरोजगारांना लाखोंचा गंडासरकारी कर्मचाऱ्याचाही आरोपी म्हणून सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :रेल्वेत तिकीट चेकरची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो तरुणांची एका टोळीने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला.

विजय मारोतराव साखरकर (२७, आराधनानगर) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सुरेंद्र तेलंग (५२, सीताबर्डी) आणि त्याचा पश्चिम बंगाल येथील साथीदार दिनेश प्रसाद या दोघांनी रेल्वेत तिकीट चेकरची (टीसी)ची नोकरी लावून देण्याचे २०१५ मध्ये आमिष दाखविले. विजयकडून त्यासाठी ८ लाख, ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर, अशाच प्रकारे चंद्रपुरातील तिघांकडून १९ लाख, ५० हजार घेतले. या चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर, या चौघांनी आरोपी तेलंगची गचांडी धरली. तो केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एका कार्यालयात नोकरी करतो. पोलीस कारवाईचा त्याला धाक दाखविल्यानंतर त्याने रक्कम परत करतो, असे सांगून ३० जून, २०१९ला काही धनादेश दिले. मात्र, खात्यात रक्कम नसल्याने ते वटलेच नाही. तेव्हापासून रक्कम मिळावी, म्हणून आरोपींकडे साखरकरसह अन्य तरुण तगादा लावून होते. तो रक्कम परत करणार नाही, अशी खात्री पटल्याने, अखेर त्यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदविली. द्वितीय पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, गुरुवारी रात्री तेलंग आणि प्रसाद या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

ओसाड ठिकाणी पाच महिने प्रशिक्षण

पीडित तरुणांच्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतर, त्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली कोलकाताजवळच्या एका गावातील ओसाड इमारतीत तब्बल पाच महिने ठेवले. यात साखरकर आणि चंद्रपुरातील तीन असे चार जण व देशाच्या इतर भागातील २० तरुण होते. त्यांना तेथे खाण्या-पिण्याचीही सोय नव्हती. जे खायचे, प्यायचे आहे, ते तुम्हीच आणा आणि तुम्हीच खा, असे सांगितले जायचे. कधीतरी एखादी ट्रेन यायची अन् हे तरुण टीसी म्हणून बाहेरूनच कर्तव्य कसे बजावायचे, त्याचे प्रात्यक्षिक करायचे.

फसवणूक झालेला तरुण पोलिसाचा मुलगा

या टोळीने देशभरातील अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, नागपुरात दोन वर्षांपूर्वी असाच एक गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळीही अशाच पद्धतीने तरुणांची फसवणूक झाली होती. रेल्वेत अशी नोकरी मिळत नाही, हे माहिती असूनही बेरोजगार तरुण लाखो रुपये दुसऱ्यांच्या हातात घालून फसवणूक करून घेतात. या प्रकरणातील तक्रारदार विजय हा निवृत्त पोलीस कर्मचारी मारोतराव साखरकर यांचा मुलगा होय, तर केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीला असूनही अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सहभागी झालेला तेलंग हा नागपुरातील पहिलाच आरोपी असावा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेjobनोकरीfraudधोकेबाजी