शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

२६ बालमजुरांची तस्करी : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:58 AM

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्यात घेतले. या बालकांना शासकीय मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले असून बुधवारी त्यांना चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दल, रेल्वे चाईल्ड लाईनची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्यात घेतले. या बालकांना शासकीय मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले असून बुधवारी त्यांना चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने मोठ्या प्रमाणात बालमजुरांची तस्करी होत असल्याची माहिती रेल्वे चाईल्ड लाईनला मिळाली. रेल्वे चाईल्ड लाईनने ही माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिली. खरोखर या गाडीत बालमजूर आहेत का हे पाहण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने नरखेडवरून दोन जवानांना गाडीत पाठविले. या जवानांनी कोच क्रमांक एस ८, ९, १०, ११ आणि मागील जनरल कोचमध्ये बालक प्रवास करीत असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांना दिली. ही गाडी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर येताच २६ बालकांना गाडीखाली उतरविले. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान, स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, उपस्टेशन व्यवस्थापक राजू इंगळे, वाणिज्य विभागाचे कर्मचारी आणि २० आरपीएफ जवानांचा ताफा प्लॅटफार्मवर हजर होता. या बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी आरपीएफ ठाण्यात आणले. तेथे त्यांच्यासाठी जेवण बोलविण्यात आले. विविध कामासाठी विविध ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती बालकांनी चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना दिली. हे बालक बिहार, दानापूर, खगरिया, मध्य प्रदेशातील शहडोल, झिरीया अशा विविध भागातील आहेत. ही कारवाई वरदान इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ अ‍ॅडॉप्शनच्या अध्यक्ष डॉ. मंगला देशकर, सचिव सरोज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कामासाठी नेत होते बालकांनादानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये ताब्यात घेतलेल्या मुलांना विविध कामांसाठी नेण्यात येत होते. यात सिकंदराबादला मेट्रोचे पाईप तयार करण्यासाठी ११ बालकांना नेण्यात येत होते. तीन बालकांना सिकंदराबादच्या पाईप कंपनीत आणि दोन बालकांना फळांचे लोडींग करण्यासाठी नेण्यात येत होते तर दोन बालकांना पेंटिंगच्या कामासाठी सिकंदराबादला नेण्यात येत होते.

पुन्हा आढळले नऊ बालकदानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील बालकांना गाडीखाली उतरविण्याच्या कारवाईसाठी या गाडीला २० मिनिटे अधिक उशीर झाला. दरम्यान या गाडीत आणखी बालमजूर असल्याची शंका असल्यामुळे आरपीएफने दोन जवानांना या गाडीत पाठविले होते. जवानांना या गाडीत आणखी नऊ बालक आढळले. त्यातील पाच बालक अल्पवयीन असून त्यांना बल्लारशाह रेल्वेस्थानकावर गाडीखाली उतरविण्यात आले. तेथे या बालकांना चंद्रपूर रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले.

बहुतांश बालकांचा जन्म १ जानेवारीचाताब्यात घेण्यात आलेल्या २६ पैकी १६ बालकांजवळ आढळलेल्या आधारकार्डवर त्यांची जन्मतारीख १ जानेवारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक सारखी जन्मतारीख असल्यामुळे या बालकांजवळील आधारकार्ड बनावट असल्याची शंका रेल्वे चाईल्ड लाईनने व्यक्त केली आहे.

बेस किचनचे भोजन निघाले निकृष्ट दर्जाचे बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी आरपीएफ ठाण्यात आणल्यानंतर त्यांची आस्थेने चौकशी करण्यात आली. यातील बहुतांश बालकांना भूक लागल्यामुळे त्यांच्यासाठी आयआरसीटीसीच्या जनाहारमधून भोजन बोलविण्यात आले. परंतु दोन घास तोंडात टाकताच बालकांनी या भोजनाकडे पाठ फिरविली. भोजन का करीत नसल्याचे विचारताच या बालकांनी शिळ्या अन्नाची दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यावर रेल्वे सुरक्षा दलाने हे भोजन तपासले असता हे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले. यावरून जनाहारमध्ये प्रवाशांना निकृष्ट भोजन पुरविण्यात येत असल्याची बाब स्पष्ट झाली.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीrailwayरेल्वे