शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

विदर्भ राज्यासाठी २५ ला रेल रोको आंदोलन : विदर्भवाद्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 21:51 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २५ फेब्रुवारीला मनीषनगर रेल्वे फाटक, वर्धा रोड येथे रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देहजारो कार्यकर्ते होणार सहभागी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २५ फेब्रुवारीला मनीषनगर रेल्वे फाटक, वर्धा रोड येथे रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनात हजारो विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे संयोजक राम नेवले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.नेवले यांनी यावेळी भाजपाचे विदर्भातील नेते आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या पुढाऱ्यांनी विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन पाळले नाही. केंद्रीय नेतृत्वाने जनतेच्या भावना समजून घेतल्या नाही, त्यामुळे एकामागून एक राज्य त्यांच्या हातातून जात असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर विदर्भातूनही त्यांचा सफाया होईल, असा इशारा त्यांनी दिला. सर्वच पक्षाचे पुढारी व सर्व पक्षीय सरकारने विदर्भ राज्य निर्मितीचा प्रश्न टाळल्याचा आरोप डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. भाषेचे कारण देऊन विदर्भाच्या मागणीला बगल दिली जाते. मात्र ६० वर्ष विदर्भावर झालेल्या अन्यायाचा महाराष्ट्रावाद्यांनी हिशेब द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. नवीन राज्याची निर्मिती करणे केंद्र शासनाच्या अधिकारात येते. त्यामुळे केंद्राची रेल्वे रोखून त्यांना विदर्भाच्या आंदोलनाचा इशारा दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. २५ रोजी दुपारी १२ वाजता संपूर्ण विदर्भातून आलेले विदर्भवादी कार्यकर्ते मनीषनगर रेल्वे फाटकाजवळ एकत्र येतील आणि लगेच आंदोलनाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवर विजेचे युनिट वाढवून २२ हजार कोटी आणि राज्या शासनातर्फे मिळालेले सबसीडीचे ८ हजार कोटी असे ३० हजार कोटी लुटल्याचा आरोप डॉ. खांदेवाले यांनी केला. त्यामुळे विदर्भाच्या मागणीसह विदर्भातील जनतेला २०० युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, २०० युनिटनंतरचे दर निम्मे करावे, शेतीपंपाचे बिल माफ करावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद करण्यात यावे आदी मागण्याही समोर ठेवण्यात आल्या आहेत. पत्रपरिषदेला प्रबीरकुमार चक्रवर्ती, रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, विष्णूजी आष्टीकर, गुलाबराव धांडे, प्रशांत मुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भrailwayरेल्वेagitationआंदोलन