शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत हवा २५ टक्के वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:28 IST

केंद्र शासनामार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण तीन भागात करण्यात येणार आहे. हे तीन भाग करताना या निधीचा २५ टक्के वाटा जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशी विनंती जिल्हा परिषद शासनाला करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनामार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण तीन भागात करण्यात येणार आहे. हे तीन भाग करताना या निधीचा २५ टक्के वाटा जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशी विनंती जिल्हा परिषद शासनाला करणार आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसंदर्भात चर्चा झाली. यात २५ टक्के वाटा जि.प. ला देण्यात यावा, यासंदर्भात शासनाला विनंती करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यातील विविध भागातून मजूर कंपनीत कामासाठी येत असताना शासनाने आखून दिलेले निकष पाळत नसल्याने सदस्यांनी चिंता व्यक्त केली. प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या. तसेच जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ती तातडीने भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर टंचाई आराखड्याचा निधी मंजूर असताना प्रशासनाने अद्याप कामे सुरू न केल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर लगेच प्रशासकीय मान्यता घेऊन ३० जूनपर्यंत संपूर्ण कामे करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती भारती पाटील, नेमावली माटे, तापेश्वर वैद्य, उज्ज्वला बोढारे, अनिल निधान, नाना कंभाले, संजय झाडे, दिनेश बंग, ज्योती राऊत, अवंतिका लेकुरवाळे, वंदना बालपांडे, आतिश उमरे उपस्थित होते.‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र कामांची चौकशी‘क’वर्ग तीर्थक्षेत्र विकास व इतर योजनेंतर्गत अनेक कामांचे दोन-तीनदा नियोजन केले जाते. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतरही प्रशासकीय मान्यतेसाठी विभागाकडे पाठविले जात असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्या सर्व कामांची चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरfundsनिधी