शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:03 IST

‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीजजोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल ३५ हजार ७९२ वीजजोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ४२ हजारवर लाभार्थी : गडचिरोली ३५ हजारावर घरकुलांना जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीजजोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल ३५ हजार ७९२ वीजजोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.२०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे विदर्भात एकूण ५७ लाख १९ हजार ३३८२ घरकुले होती, त्यापैकी १० आॅक्टोबर २०१७ पर्यंत ५४ लाख ८७ हजार ६३३ घरकुलांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते तर २ लाख ३१ हजार ७४९ घरकुले विजेपासून वंचित होती. विजेपासून वंचित नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ‘सौभाग्य’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी दिल्ली येथे केला होता तर महाराष्ट्रात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ २३ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथे करण्यात आला होता.लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने विजेपासून वंचित असलेल्या विदर्भातील सर्वच २ लाख ३१ हजार ७४९ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येऊन त्यापुढे जात ‘सौभाग्य रथ’ मोहिमे अंतर्गत महावितरणने फेब्रुवारी २०१९ च्या अखेरपर्यंत १७ हजार १२१ नवीन घरकुलांना वीजजोडणी दिल्याने या योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा २ लाख ४८ हजार ८७० पर्यंत नेत १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी दिली गेल्याने रोजगारांच्या संधीत वाढ होऊन स्त्रियांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणांचे नवीन दालन उघडले आहे.गरिबांना मोफत, तर इतरांकडून केवळ ५०० रुपये शुल्कसौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून १० टप्प्यात वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.

 

टॅग्स :electricityवीजVidarbhaविदर्भ