शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

... तर २०२५ पर्यंत जगातील ४ अब्ज लाेक हवामान बदलाने होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 21:17 IST

Nagpur News येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसुवा लामा यांनी व्यक्त केली शक्यतावनराई फाउंडेशनतर्फे कार्यशाळा

नागपूर : वैश्विक तापमान सातत्याने वाढत असून दरवर्षी ते असेच वाढत जाणार आहे. सध्या तापमान वाढीची सरासरी १.६० अंशावर आहे आणि ही धाेक्याची पातळी आहे. मानवाने आता काही हालचाली केल्या नाही तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.

वनराई फाउंडेशनच्या वतीने ‘हवामान बदल व त्याचे पर्जन्य, हिवाळा व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयाेजित चर्चासत्रात ते बाेलत हाेते. नीरीचे माजी संचालक डाॅ. सतीश वटे यांच्या संकल्पनेतून आयाेजित या चर्चासत्रात वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, जेएनयुच्या पर्यावरण विज्ञान शाळा, दिल्लीचे अधिष्ठाता प्रा. उमेश कुलश्रेष्ठ, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे उपमहासंचालक एम.एल. साहू, इंडियन कॅन्सर साेसायटीचे डाॅ. मनमाेहन राठी यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. लामा यांनी पाऊस पॅटर्न समूळ बदलल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी पाऊस वेळापत्रानुसार ठरावीक कालावधीत पडायचा. मात्र मागील काही वर्षात ताे कधी एकाचवेळी भरपूर पडताे तर अनेक दिवस पडतही नाही. ढगफुटी किंवा अतिपावसाचे प्रकार वाढले आहेत. त्यात व्यापकताही दिसून येत नाही. हवामान बदलाचे परिणाम थांबवायचे असतील कार्बन उत्सर्जन कमी करून नैसर्गिक उपाय याेजावे लागतील, असे त्यांनी सूचित केले.

हवामान केंद्राचे माेहनलाल साहू यांनी, मागील १०० वर्षाच्या नाेंदीचा उल्लेख करीत विदर्भात पर्जन्यमान कमी कमी हाेत गेल्याची माहिती दिली. हवामान बदल सातत्याने हाेणारी प्रक्रिया आहे आणि आपण ती थांबवू शकत नाही. त्याचे जैवविविधतेवर परिणाम दिसूनही येत आहेत. त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर निसर्गातील मानवी हस्तक्षेप थांबविणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. उमेश कुलश्रेष्ठ यांनी चेन्नईतील पूर, हिमाचल प्रदेशातील ढगफुटी अशा मागील काही वर्षातील अनेक घटनांच्या नाेंदी समाेर ठेवत हवामान बदलामुळे हाेत असलेल्या परिणामांची कारणमिमांसा मांडली. मानवी हस्तक्षेपामुळे हाेत असलेले निसर्गाचे शाेषण, इंधनाचा प्रचंड वाढलेला वापर, औद्याेगिकरणाची स्पर्धा या घटकांमुळे निसर्गाचा असमताेल वाढल्याचे नमूद केले.

डाॅ. मनमाेहन राठी म्हणाले, आपल्या शरीराचे चक्र निसर्गावर अवलंबून आहे. तापमान असेच वाढत राहिले तर निसर्गात असमताेल वाढेल व त्याचा परिणाम मानवी शरीरावर हाेईल. अनुकूल वातावरण मिळाले तर वेगवेगळ्या विषाणूंचा प्रभाव वाढेल व त्यातून जलप्रदूषण, अन्नप्रदूषणातून माणसांवर गंभीर आजारांचा विळखा वाढेल. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, हे त्याचेच द्याेतक असल्याचे डाॅ. राठी यांनी स्पष्ट केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :environmentपर्यावरण