शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

... तर २०२५ पर्यंत जगातील ४ अब्ज लाेक हवामान बदलाने होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 21:17 IST

Nagpur News येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसुवा लामा यांनी व्यक्त केली शक्यतावनराई फाउंडेशनतर्फे कार्यशाळा

नागपूर : वैश्विक तापमान सातत्याने वाढत असून दरवर्षी ते असेच वाढत जाणार आहे. सध्या तापमान वाढीची सरासरी १.६० अंशावर आहे आणि ही धाेक्याची पातळी आहे. मानवाने आता काही हालचाली केल्या नाही तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.

वनराई फाउंडेशनच्या वतीने ‘हवामान बदल व त्याचे पर्जन्य, हिवाळा व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयाेजित चर्चासत्रात ते बाेलत हाेते. नीरीचे माजी संचालक डाॅ. सतीश वटे यांच्या संकल्पनेतून आयाेजित या चर्चासत्रात वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, जेएनयुच्या पर्यावरण विज्ञान शाळा, दिल्लीचे अधिष्ठाता प्रा. उमेश कुलश्रेष्ठ, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे उपमहासंचालक एम.एल. साहू, इंडियन कॅन्सर साेसायटीचे डाॅ. मनमाेहन राठी यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. लामा यांनी पाऊस पॅटर्न समूळ बदलल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी पाऊस वेळापत्रानुसार ठरावीक कालावधीत पडायचा. मात्र मागील काही वर्षात ताे कधी एकाचवेळी भरपूर पडताे तर अनेक दिवस पडतही नाही. ढगफुटी किंवा अतिपावसाचे प्रकार वाढले आहेत. त्यात व्यापकताही दिसून येत नाही. हवामान बदलाचे परिणाम थांबवायचे असतील कार्बन उत्सर्जन कमी करून नैसर्गिक उपाय याेजावे लागतील, असे त्यांनी सूचित केले.

हवामान केंद्राचे माेहनलाल साहू यांनी, मागील १०० वर्षाच्या नाेंदीचा उल्लेख करीत विदर्भात पर्जन्यमान कमी कमी हाेत गेल्याची माहिती दिली. हवामान बदल सातत्याने हाेणारी प्रक्रिया आहे आणि आपण ती थांबवू शकत नाही. त्याचे जैवविविधतेवर परिणाम दिसूनही येत आहेत. त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर निसर्गातील मानवी हस्तक्षेप थांबविणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. उमेश कुलश्रेष्ठ यांनी चेन्नईतील पूर, हिमाचल प्रदेशातील ढगफुटी अशा मागील काही वर्षातील अनेक घटनांच्या नाेंदी समाेर ठेवत हवामान बदलामुळे हाेत असलेल्या परिणामांची कारणमिमांसा मांडली. मानवी हस्तक्षेपामुळे हाेत असलेले निसर्गाचे शाेषण, इंधनाचा प्रचंड वाढलेला वापर, औद्याेगिकरणाची स्पर्धा या घटकांमुळे निसर्गाचा असमताेल वाढल्याचे नमूद केले.

डाॅ. मनमाेहन राठी म्हणाले, आपल्या शरीराचे चक्र निसर्गावर अवलंबून आहे. तापमान असेच वाढत राहिले तर निसर्गात असमताेल वाढेल व त्याचा परिणाम मानवी शरीरावर हाेईल. अनुकूल वातावरण मिळाले तर वेगवेगळ्या विषाणूंचा प्रभाव वाढेल व त्यातून जलप्रदूषण, अन्नप्रदूषणातून माणसांवर गंभीर आजारांचा विळखा वाढेल. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, हे त्याचेच द्याेतक असल्याचे डाॅ. राठी यांनी स्पष्ट केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :environmentपर्यावरण