शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

... तर २०२५ पर्यंत जगातील ४ अब्ज लाेक हवामान बदलाने होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 21:17 IST

Nagpur News येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसुवा लामा यांनी व्यक्त केली शक्यतावनराई फाउंडेशनतर्फे कार्यशाळा

नागपूर : वैश्विक तापमान सातत्याने वाढत असून दरवर्षी ते असेच वाढत जाणार आहे. सध्या तापमान वाढीची सरासरी १.६० अंशावर आहे आणि ही धाेक्याची पातळी आहे. मानवाने आता काही हालचाली केल्या नाही तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.

वनराई फाउंडेशनच्या वतीने ‘हवामान बदल व त्याचे पर्जन्य, हिवाळा व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयाेजित चर्चासत्रात ते बाेलत हाेते. नीरीचे माजी संचालक डाॅ. सतीश वटे यांच्या संकल्पनेतून आयाेजित या चर्चासत्रात वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, जेएनयुच्या पर्यावरण विज्ञान शाळा, दिल्लीचे अधिष्ठाता प्रा. उमेश कुलश्रेष्ठ, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे उपमहासंचालक एम.एल. साहू, इंडियन कॅन्सर साेसायटीचे डाॅ. मनमाेहन राठी यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. लामा यांनी पाऊस पॅटर्न समूळ बदलल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी पाऊस वेळापत्रानुसार ठरावीक कालावधीत पडायचा. मात्र मागील काही वर्षात ताे कधी एकाचवेळी भरपूर पडताे तर अनेक दिवस पडतही नाही. ढगफुटी किंवा अतिपावसाचे प्रकार वाढले आहेत. त्यात व्यापकताही दिसून येत नाही. हवामान बदलाचे परिणाम थांबवायचे असतील कार्बन उत्सर्जन कमी करून नैसर्गिक उपाय याेजावे लागतील, असे त्यांनी सूचित केले.

हवामान केंद्राचे माेहनलाल साहू यांनी, मागील १०० वर्षाच्या नाेंदीचा उल्लेख करीत विदर्भात पर्जन्यमान कमी कमी हाेत गेल्याची माहिती दिली. हवामान बदल सातत्याने हाेणारी प्रक्रिया आहे आणि आपण ती थांबवू शकत नाही. त्याचे जैवविविधतेवर परिणाम दिसूनही येत आहेत. त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर निसर्गातील मानवी हस्तक्षेप थांबविणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. उमेश कुलश्रेष्ठ यांनी चेन्नईतील पूर, हिमाचल प्रदेशातील ढगफुटी अशा मागील काही वर्षातील अनेक घटनांच्या नाेंदी समाेर ठेवत हवामान बदलामुळे हाेत असलेल्या परिणामांची कारणमिमांसा मांडली. मानवी हस्तक्षेपामुळे हाेत असलेले निसर्गाचे शाेषण, इंधनाचा प्रचंड वाढलेला वापर, औद्याेगिकरणाची स्पर्धा या घटकांमुळे निसर्गाचा असमताेल वाढल्याचे नमूद केले.

डाॅ. मनमाेहन राठी म्हणाले, आपल्या शरीराचे चक्र निसर्गावर अवलंबून आहे. तापमान असेच वाढत राहिले तर निसर्गात असमताेल वाढेल व त्याचा परिणाम मानवी शरीरावर हाेईल. अनुकूल वातावरण मिळाले तर वेगवेगळ्या विषाणूंचा प्रभाव वाढेल व त्यातून जलप्रदूषण, अन्नप्रदूषणातून माणसांवर गंभीर आजारांचा विळखा वाढेल. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, हे त्याचेच द्याेतक असल्याचे डाॅ. राठी यांनी स्पष्ट केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :environmentपर्यावरण