शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; २०० वऱ्हाडी, पाहुण्यांसह आटोपून घ्या 'शुभमंगल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 12:10 IST

संक्रमण ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, लग्नसोहळ्यांना हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देलग्नसोहळ्यांना २०० उपस्थितांची मिळाली परवानगी हिरमुसल्या कुटुंबीयांमध्ये संचारला उत्साह

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून सततच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यांवर विरजण पडले होते. त्यातच या सोहळ्यांवर विसंबून असलेला रोजगारही डबघाईस आला होता. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय व लॉन्सचा व्यवसाय पूर्णत: चौपट झाला आहे. थोडी उसंत मिळत नाही तोच संक्रमणाचा वेग वाढत असल्याने आणि नाइलाजाने शासनाला लावावे लागत असलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा व्यवसायावर मरगळ निर्माण होत होती.

अशात संक्रमण ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, लग्नसोहळ्यांना हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगीचे पत्र जारी केले असल्याने मंगल कार्यालये व नियोजित विवाहसोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

वधू-वर पित्याची चिंता मिटली

संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० निमंत्रितांच्या उपस्थितीतच विवाह सोहळे आटोपण्याची परवानगी होती. नियम मोडल्यास दंडाची तरतूद होती. त्यामुळे, अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी तशातच आटोपण्याची तयारी सुरू केली होती. आता मात्र शासनाने जारी केलेल्या परवानगीमुळे वर-वधू पित्यांची चिंता मिटली आहे.

मंगल कार्यालयांना दिलासा

विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर विसंबून असणारे दैनिक रोजगार शासनाच्या या निर्णयामुळे पुन्हा सुरू होतील. मंगल कार्यालये, लॉन्स, कॅटरिंग, डेकोरेशन, बॅण्डपथक, मेंदी, डिजे आदींचा रोजगार पुन्हा वाढायला लागेल. आता पुन्हा निर्बंधांची अपेक्षा नाही. शासनाने रोजगाराच्या अनुषंगाने खबरदारी घ्यावी.

- उमाकांत जट्टेवार, कार्याध्यक्ष - नागपूर हॉल ॲण्ड लॉन्स असोसिएशन

शहरातील संख्या

* मंगल कार्यालये - ३००च्या वर

* लॉन्स - १५०च्या वर

फेब्रुवारी-मार्चमधील लग्नाचे मुहूर्त

* शास्त्रानुसारचे उत्तम मुहूर्त

फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७

मार्च - २३, २५, २६, २८, २९

* गुरू-शुक्राच्या अस्तकाळातील मुहूर्त (अस्त दोषाचे)

फेब्रवारी - २०, २१, २२, २३, २४, २५

मार्च - ४, ५, ९, १०, २०

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक