शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

नागपूर विभागात २० टक्केच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:21 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेबाबात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने नाराजी आहे. पीक विमा खासगी कंपन्यांना पोसण्यासाठी सरकारने चालविलेला फार्स आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांचा आरोप योग्य असल्याचे दिसते आहे. नागपूर विभागात २,४४,३५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५४३३६ शेतकरीच लाभार्थी ठरले. २०१७-१८ मध्ये मोठ्या संख्येने वादळ, गारपीट, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव यामुळे नुकसान झाले. असे असतानाही २० टक्केच शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी ठरल्याने, शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

ठळक मुद्दे२,४४,३५७ शेतकऱ्यांनी काढला होता विमा : ५४३३६ शेतकरी ठरले लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेबाबात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने नाराजी आहे. पीक विमा खासगी कंपन्यांना पोसण्यासाठी सरकारने चालविलेला फार्स आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांचा आरोप योग्य असल्याचे दिसते आहे. नागपूर विभागात २,४४,३५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५४३३६ शेतकरीच लाभार्थी ठरले. २०१७-१८ मध्ये मोठ्या संख्येने वादळ, गारपीट, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव यामुळे नुकसान झाले. असे असतानाही २० टक्केच शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी ठरल्याने, शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.शेतकऱ्यांना शेती उत्पादनात स्थैर्य प्राप्त करून देता यावे आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करता यावा यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान आधारित पीक विमा योजना गुंडाळून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. योजनेमध्ये खासगी विमा कंपन्यांना भरपूर वाव देण्यात आला. मोठ्या प्रमाणावर प्रचार व जाहिराती करून तसेच बँकातून कर्ज घेणाºया शेतकऱ्यांना विम्याची सक्ती करण्यात आली. नागपूर विभागात सहाही जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये २,४४,३५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला किंवा सक्तीने पीक विमा काढून घेतला. जवळपास २,५२,९७४.२१ हेक्टर जमिनीचा पीक विमा काढण्यात आला. यासाठी संरक्षित रक्कम ९९१.११ कोटी नोंदविण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे ६०.०९ कोटी जमा करण्यात आले. शासनाने २०१७-१८ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ला वर्धा, गोंदिया व गडचिरोलीचे काम दिले होते. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याचे काम भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबईकडे होते तर दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे ही कंपनी भंडारा जिल्ह्यासाठी नियुक्त केली होती. नुकसान नियमात बसतच नाहीकामठी तालुक्यातील वादळामुळे धानाचे नुकसान झाले होते. कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी शेतात पोहचले. पण हे नुकसान नियमात बसतच नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केली.विनोद पाटील, सदस्य, जि.प.

सर्वेक्षणही झाले बोगसनुकसानभरपाईचा झालेला सर्वे हा बोगस निघाला. अधिकारी शेतात पोहचलेच नाही. कार्यालयात बसून निव्वळ कागद रंगविण्यात आले. त्यामुळेच तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. हे शक्य आहे का?मनोहर कुंभारे, जि.प. सदस्य.

 विमा केवळ कंपन्यांचे हित जोपासण्यासाठीइन्शुरन्स कंपन्या, केमिकल कंपन्या ह्या राजकीय पक्षांना निवडणुकीत फंड देतात. त्यांचे हित जोपासण्यासाठी पीक विमा आहे. विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पॉलिसी दिली जात नाही. टर्म अ‍ॅण्ड कंडीशन शेतकऱ्यांना माहिती नसते. ग्रा.पं.मध्ये कंपनीचा एजंट नसतो. कुठल्या भरोशावर विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देणार आहे. अधिकारी सर्वेक्षणासाठी शेतात जात नाही. तर पीक विमा कसा मिळणार? सर्वंकष पीक विमा योजना असावी आणि ती पारदर्शक असावी. नुकसानीची भरपाई सरकारने घ्यावी. खासगी कंपन्यांना तर पीक विमा देऊच नये. नाहीतर शेतकरी निव्वळ फसविले जातील.अमिताभ पावडे, कृषीतज्ज्ञ

विमा योजनेचे जिल्हानिहाय लाभार्थी 

जिल्हा            शेतकरी संख्या                    विमा मिळालेले शेतकरी                           रक्कम (लाखात)

   
वर्धा                   ३२३३१                              २६०                                                     ११.४०   
नागपूर               ३६२१८                               १४४७                                                   १३६.२४   
भंडारा                ६८२७०                             १६९१५                                                  १०७८.४७   
गोंदिया              ४७५९१                               ६२६२                                                   १५८.८१   
चंद्रपूर               ४११६०                                २४७१८                                                 ४३५२.३७   
गडचिरोली          १८७८७                               ४७३४                                                  २७२.०८       
टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा