शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

२० एकरातील डाळिंबाची बाग उपटून जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:19 IST

नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुका दर्जेदार ‘नागपुरी संत्रा’च्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध होता. तांत्रिक कारणांमुळे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. त्यातच काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, वंडली (ता. काटोल) येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी डाळिंबाची निवड केली. उत्पादनखर्चाच्या तुलनेत डाळिंबाला बाजारात मिळणारा भाव कमी असल्याने ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या २० एकराची डाळिंबाची झाडे उपटून काढली आणि पेटवून दिली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील शेतकऱ्याचा असाही संतापसंत्र्यापाठोपाठ डाळिंबानेही दिला दगाउत्पादनखर्च भरून निघेना

धीरज ढोले। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (काटोल) : नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुका दर्जेदार ‘नागपुरी संत्रा’च्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध होता. तांत्रिक कारणांमुळे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. त्यातच काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, वंडली (ता. काटोल) येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी डाळिंबाची निवड केली. उत्पादनखर्चाच्या तुलनेत डाळिंबाला बाजारात मिळणारा भाव कमी असल्याने ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या २० एकराची डाळिंबाची झाडे उपटून काढली आणि पेटवून दिली.वाढते तापमान, भूगर्भातील खोलवर गेलेली पाण्याची पातळी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि शासनाची अनास्था यामुळे ‘नागपुरी संत्रा’च्या काटोल व नरखेड तालुक्यातील बागांना उतरती कळा आली. काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, रामराव महाराज ढोक यांनी मोसंबीऐवजी डाळिंबाची निवड केली.त्यांनी दोन वर्षांपूर्वी तब्बल २० एकरात डाळिंबाच्या कलमांची लागवड केली. या जातिवंत कलमा खानदेशातील जळगाव येथून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांनी एकरी ४७५ कलमांची लागवड केली होती. या कलमांना दीड वर्षानंतर फलधारणा होत असून, डाळिंब किमान ७० ते ८० रुपये प्रति किलोप्रमाणे विकले जात असल्याने वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे सांगण्यात आल्याने आपण डाळिंब लागवडीचा निर्णय घेतल्याचे रामराव ढोक यांनी सांगितले.वास्तवात, उत्पादनखर्च अधिक आणि त्याला बाजारात मिळणारा भाव अत्यल्प असल्याने डाळिंबाचे उत्पादन परवडण्याजोगे नाही. शिवाय, रोग व किडींपासून वाचविण्यासाठी झाडांवर महागड्या कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आल्याने उत्पादनखर्च वाढतो. ही बाब परवडण्याजोगी नसल्याने आपण ही बाग उपटून शेत साफ केल्याचे त्यांनी सांगितले.एकरी अडीच लाख रुपये खर्चडाळिंबाचा एकरी उत्पादनखर्च दोन ते अडीच लाख रुपये आहे. बाजारातील डाळिंबाचे किरकोळ भाव किमान ८० रुपये प्रति किलो असले तरी तेच डाळिंब शेतकऱ्यां

कडून १० ते ३० रुपये प्रति किलोप्रमाणे खरेदी केले जातात. चांगल्या प्रतिच्या डाळिंबाला ३० रुपये, मध्यम प्रतिच्या डाळिंबाला २० व हलक्या प्रतिच्या डाळिंबाला प्रति किलो १० रुपये भाव मिळतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास डाळिंबाचे पीक हाती लागत नाही.मोठे आर्थिक नुकसानकाटोल तालुक्यात काही शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेचा प्रयोग केला. रामराव महाराज ढोक यांच्या पाठोपाठ वंडली (ता. काटोल) येथील अमोल ठाकरे आणि दिग्रस (बु) (ता. काटोल) येथील अनुप खराडे यांनीही त्यांच्या शेतातील डाळिंबाची झाडे उपटून जाळली. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेवर लाखो रुपयांची गुंतवणूक केली. पदरी निराशा पडल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर