शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

विदर्भातील १९.३९ लाख शेतकरी मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:00 IST

राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्दे१३६२ कोटींचा प्रस्तावबोंडअळी आणि मावा-तुडतुड्यामुळे नुकसान

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानवर आलेल्या रोगराईने विदर्भातील कापूस व धान उत्पादकांना मोठा फटका बसला. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. शासकीय निकषाप्रमाणे त्यांना १३६२ कोटी १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र त्यावर मंत्रालयातून अद्याप अंतिम निर्णय होऊन मदतनिधी देण्यात आलेला नाही.राज्य शासनाच्या जीआरनुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे. ७ डिसेंबरला राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार कापूस व धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.त्यात नागपूर विभागातील ६ जिल्ह्यातील ९ लाख ३८ हजार ११५ शेतकरी मदतीपासून पात्र ठरले आहेत. त्यांना ८१७ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात १० लाख १ हजार ६४७ शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून त्यांना ५४५ कोटी ७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

प्रत्यक्ष मदतीसाठी निधीच नाहीप्रशासकीय यंत्रणेने शेतीचे सर्व्हेक्षण करून मदतीसाठी पात्र ठरलेले शेतकरी व त्यांच्या संभाव्य मदतीचा आकडा शासनाकडे पाठविला आहे. मात्र ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हे गुलदस्त्यात आहे. कर्जमाफीमुळे मेटाकुटीत आलेल्या सरकारला ही मदत देताना आणखी तिजोरी रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे या मदतीसाठी शेतकऱ्यांना काही महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कापूस उत्पादकांची संख्या तिप्पटपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जात नाही. मात्र पूर्व विदर्भात वर्धा वगळता इतर पाच जिल्ह्यात धानासोबत कापसाचेही उत्पादन घेतले जाते. नुकसानभरपाईसाठी केवळ धान उत्पादन घेणारे ५ लाख २३ हजार २१० शेतकरी पात्र झाले आहेत. त्यांना २२७ कोटी ४६ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यांच्या तुलनेत मदतीसाठी पात्र ठरलेले कापूस उत्पादक शेतकरी १४ लाख १६ हजार ५५२ आहेत. त्यांना ११३४ कोटी ६४ लाख रुपयांची मदत मिळेल.

टॅग्स :Farmerशेतकरी