शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

विदर्भातील १९.३९ लाख शेतकरी मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:00 IST

राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्दे१३६२ कोटींचा प्रस्तावबोंडअळी आणि मावा-तुडतुड्यामुळे नुकसान

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानवर आलेल्या रोगराईने विदर्भातील कापूस व धान उत्पादकांना मोठा फटका बसला. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. शासकीय निकषाप्रमाणे त्यांना १३६२ कोटी १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र त्यावर मंत्रालयातून अद्याप अंतिम निर्णय होऊन मदतनिधी देण्यात आलेला नाही.राज्य शासनाच्या जीआरनुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे. ७ डिसेंबरला राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार कापूस व धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.त्यात नागपूर विभागातील ६ जिल्ह्यातील ९ लाख ३८ हजार ११५ शेतकरी मदतीपासून पात्र ठरले आहेत. त्यांना ८१७ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात १० लाख १ हजार ६४७ शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून त्यांना ५४५ कोटी ७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

प्रत्यक्ष मदतीसाठी निधीच नाहीप्रशासकीय यंत्रणेने शेतीचे सर्व्हेक्षण करून मदतीसाठी पात्र ठरलेले शेतकरी व त्यांच्या संभाव्य मदतीचा आकडा शासनाकडे पाठविला आहे. मात्र ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हे गुलदस्त्यात आहे. कर्जमाफीमुळे मेटाकुटीत आलेल्या सरकारला ही मदत देताना आणखी तिजोरी रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे या मदतीसाठी शेतकऱ्यांना काही महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कापूस उत्पादकांची संख्या तिप्पटपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जात नाही. मात्र पूर्व विदर्भात वर्धा वगळता इतर पाच जिल्ह्यात धानासोबत कापसाचेही उत्पादन घेतले जाते. नुकसानभरपाईसाठी केवळ धान उत्पादन घेणारे ५ लाख २३ हजार २१० शेतकरी पात्र झाले आहेत. त्यांना २२७ कोटी ४६ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यांच्या तुलनेत मदतीसाठी पात्र ठरलेले कापूस उत्पादक शेतकरी १४ लाख १६ हजार ५५२ आहेत. त्यांना ११३४ कोटी ६४ लाख रुपयांची मदत मिळेल.

टॅग्स :Farmerशेतकरी