राज्यातील १.९२ लाख शेतकरी वीज बिलातून थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST2021-03-26T04:08:38+5:302021-03-26T04:08:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कृषी ग्राहकांना वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक ...

1.92 lakh farmers in the state are free from electricity bill arrears | राज्यातील १.९२ लाख शेतकरी वीज बिलातून थकबाकीमुक्त

राज्यातील १.९२ लाख शेतकरी वीज बिलातून थकबाकीमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कृषी ग्राहकांना वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या थकबाकीमुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, २५ मार्चपर्यंत त्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना वीज बिलातून तब्बल २५५ कोटी २ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज बिलातून थकबाकीमुक्ती देण्यासाठी एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्याप्रमाणे ४४,४४,१६५ शेतकऱ्यांकडील एकूण ४५,७८७ कोटी १९ लाखांच्या एकूण थकबाकीमध्ये १०,४२१ कोटी रुपयांची निर्लेखनाद्वारे सूट देण्यात आली आहे तर, ४,६७२ कोटी ८१ लाख रुपयांची व्याज व विलंब आकारामध्ये सूट देण्यात आली आहे. या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे ३० हजार ६९३ कोटी ५५ लाख रुपयांची सुधारित मूळ थकबाकी आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीज बिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीज बिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीज बिलांपोटी ३३० कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा करून वीज बिलातून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. राज्यभरात आतापर्यंत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसाठी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी कृषिपंपाच्या थकीत व चालू वीज बिलापोटी ७४१ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

राज्यातील विभागनिहाय थकबाकीमुक्त झालेले शेतकरी

विभाग थकबाकीमुक्त शेतकरी

पुणे ८४,४५५,

कोकण ६८,०६७,

नागपूर ३०,२१९

औरंगाबाद ९,७८८

Web Title: 1.92 lakh farmers in the state are free from electricity bill arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.