शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

१७३ परकीय वनस्पतींमुळे भारतीय परिसंस्थांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 23:35 IST

Exotic plants, Indian ecosystem १७३ परकीय प्रजातींच्या वनस्पतींमुळे भारतीय परिसंस्थेचे अस्तित्व आज धाेक्यात आले असल्याची भीती व्यक्त करीत, देशी प्रजातींना परकीय प्रजातींच्या विळख्यातून सोडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी केले आहे.

ठळक मुद्देविदर्भातील वनस्पती शास्त्रज्ञाने केली नष्ट करण्याची पद्धती विकसित

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १७३ परकीय प्रजातींच्या वनस्पतींमुळे भारतीय परिसंस्थेचे अस्तित्व आज धाेक्यात आले असल्याची भीती व्यक्त करीत, देशी प्रजातींना परकीय प्रजातींच्या विळख्यातून सोडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी केले आहे.

आपल्या परिसंस्थांच्या पुनर्स्थापनेचे नियोजन व अंमलबजावणी या पर्यावरण दिनाच्या संकल्पनेवर त्यांनी मत मांडले. भारतामध्ये शुष्क पानझडी अरण्यांपासून तर दलदलयुक्त जंगले, पाणथळ जलाशय परिसंस्था, खारफुटी प्रदेश, वाळवंटी प्रदेशातील खुरटी वने ते पर्जन्यहारी वनांच्या परिसंस्थांपुढे परकीय प्रजातींनी फार मोठे आव्हान निर्माण केले आहे. देशाचे पर्यावरण सांभाळण्यात या सर्व परिसंस्था मोलाची कामगिरी बजावत असतात, परंतु या परिसंस्थांना आज काही परकीय प्रजातींनी धोका निर्माण केला आहे.

याबाबत भारतात अभ्यास करण्यात आला असून, अशा सुमारे १७३ परकीय प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या परकीय प्रजातींमध्ये घाणेरी वेडी बाभूळ, पार्थेनियम गवत, तरोटा, अलीगेटर तण, पिकांमध्ये येणारे सिआम तण तर गोड्या पाण्याच्या जल परिसंस्थांमध्ये येणारी जलपर्णी अशा प्रजातींचा समावेश होतो. त्यांचा समूळ नायनाट केल्याशिवाय आपल्या परिसंस्था खुला श्वास घेऊ शकणार नाहीत, पण ते काम तितकेसे सोपे नाही. त्यासाठी शासन तसे समाजाकडून एकाच वेळी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.

नष्ट करण्याची पद्धती

विदर्भातील डॉ.गजानन मुरतकर यांनी दिल्लीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.सी.आर. बाबू यांच्या मार्गदर्शनात अशा परकीय वनस्पतींचे उच्चाटन करून स्थानिक गवत प्रजाती वाढविणारी एक विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. भारतातील सुमारे १२ राज्यांमध्ये त्यांनी वनविभागाच्या माध्यमातून ही पद्धती राबविली आहे. मागील पाच-सहा वर्षांमध्ये या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले आहे. विदर्भातील लोणार सरोवरातून वेडी बाभूळ उच्चाटनाचे, मेळघाटमधून घाणेरी (लांटेना) समूळ नष्ट करण्याचे तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यांमधील तलावांमधून बेश्रम उच्चाटन करून स्थानिक प्रजाती लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण