शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 10:50 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे.

ठळक मुद्देअध्यक्षांचा शिक्षकांसह शिक्षण विभागावर ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे. गणवेशासाठी डीबीटी केवळ जि.प. मध्येच नाही, तर महापालिकेतही आहे. परंतु महापालिकेच्या शिक्षकांनी दाखविलेल्या समंजसपणामुळे महापालिकेचे विद्यार्थी गणवेशात शाळेत येत आहे. जि.प.च्या शिक्षक व शिक्षण विभागाने हा समंजसपणा दाखविला असता, तर ही नामुष्की जि.प.वर आली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.गणवेशासाठी ४०० रुपये प्रति विद्यार्थीप्रमाणे अनुदान आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे आहे. शिक्षण विभागाने गणवेशासाठी गट स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात गणवेशाचा २ कोटी ९२ लाखाचा निधी वळता केला आहे. गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याची जबाबदारी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी, कें द्र प्रमुख, विस्तार अधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले होते. कुठे विद्यार्थ्यांना खाते उघडण्यास समस्या निर्माण होत असल्यास संबंधित अधिकाºयांना बँकेकडे याबाबत पाठपुरावा करून खाते उघडून देण्याबाबत सूचना करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. परंतु संबंधित सर्व यंत्रणेने हात काढून सर्व जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खांद्यावर सोपविली. परंतु शिक्षकांनीही त्यात रस न दाखविल्याने अद्यापही १६ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहे.५१,०६९ विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान वळतेजि.प. शिक्षण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यातील सुमारे १६४३ शाळेतील ७३ हजार ३७३ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र होते. शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात असूनही आजवर केवळ ५७ हजार १६४ लाभार्थी विद्यार्थ्यांचेच बँक खाते उघडू शकले आहे. यातील ५१ हजार ०६९ विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान वळते केल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.तालुकास्तरीय अधिकाºयांचे जि.प. शाळांकडे दुर्लक्षतालुकास्तरीय गट शिक्षण अधिकारी, बीडीओ, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांचा ओढा जि.प.च्या शाळेपेक्षा खाजगी शाळांकडे जास्त आहे. जि.प. शाळांच्या दुर्लक्ष करणारे हे अधिकारी खाजगी शाळांच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होतात. खाजगी शाळांचे कौतुकही करतात, परंतु जि.प.च्या शाळांच्या विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर