१६० कोटीची थकबाकी
By Admin | Updated: May 18, 2014 01:01 IST2014-05-18T01:01:15+5:302014-05-18T01:01:15+5:30
ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाणीपट्टीचे १६० कोटी थकबाकी आहे.

१६० कोटीची थकबाकी
जीवन प्राधिकरण : पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती रखडली
नागपूर: ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाणीपट्टीचे १६० कोटी थकबाकी आहे. थकबाकीची वसुली होत नसल्याने योजनांची दुरुस्ती रखडली असून प्राधिकरणच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद व महापालिकांच्या जलव्यवस्थापन केंद्राची कामे, त्यांचे परिरक्षण यासह ठेवीच्या स्वरूपातील बांधकाम अशा स्वरूपाची कामे प्राधिकरणमार्फत केली जातात. यापासून मिळणार्या पाणीपट्टीतून प्राधिकरणचा आस्थापना खर्च, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व अन्य कामे केली जातात. मागील काही वर्षापासून हा निधी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वसूल होत नाही. पूर्वी अशा स्वरूपाची थकबाकी वसूल न झाल्यास मध्यवर्ती अनुदानातून कपात क रून ही रक्कम जीवन प्राधिकरणच्या खात्यात वळती केली जात होती. २००३ सालापासून निधी वळता करण्याची प्रक्रि या शासनाने थांबविली. त्यामुळे वसुली थांबली आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. नागपूर विभागातील बल्लारपूर पाणीपुरवठा योजना, देवलामेटी व नागपूर जिल्हा परिषदेची वेणा पाणीपुरवठा आदी योजनांकडे २७ कोटींची थकबाकी आहे. अमरावती विभागातील अमरावती महापालिकेसह अंजनगाव, दर्यापूर, मोर्शी नगर परिषद तसेच खोलापूर ग्रामपंचायत यांच्याकडे ७८ कोटींची थकबाकी आहे. यवतमाळ विभागातील यवतमाळ, खामगाव, जळगाव, पातूर, आकोट, कारंजा व मानोरा पाणीपुरवठा योजनांकडे ५४ कोटी ५३ लाखांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी) अनुदानातून थकबाकीची कपात व्हावी स्थानिक स्वराज्य संस्थाकडील १६० कोटींच्या थकबाकीची वसुली होत नसल्याने प्राधिकरणला योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत. शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्यवर्ती अनुदानातून थकबाकीची कपात केल्यास प्राधिकरण र्आिर्थक संकटातून सावरेल, अशी प्रतिक्रि या जीवन प्राधिकरणचे सहायक अभियंता ए. के. ढवळे यांनी दिली