१६ गार्इंचे प्राण वाचले
By Admin | Updated: June 15, 2015 02:56 IST2015-06-15T02:56:10+5:302015-06-15T02:56:10+5:30
भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे १६ गाई आणि एका बैलाचे प्राण वाचले.

१६ गार्इंचे प्राण वाचले
नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे १६ गाई आणि एका बैलाचे प्राण वाचले. कार्यकर्त्यांनी रविवारी ऐनवेळी घटनास्थळी जाऊन कत्तलखान्यात नेला जाणारा गाई भरलेला ट्रक कळमना पोलिसांच्या हवाली केला. कळमन्यातील कापसी पुलाजवळ तीन आरोपींनी एका ट्रकमध्ये १६ गाई आणि एक बैल अशी १७ जनावरे भरून तो कत्तलखान्याकडे नेण्याची तयारी चालवली होती. ही माहिती कळताच रविवारी दुपारी ३ च्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री सचिन करारे तसेच आदर्श माहुरकर, युवराज राणा, कपिल लेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कापसी पुलाकडे धाव घेतली. हे सर्व ट्रकजवळ पोहचताच दोन आरोपी पळून गेले. ट्रकचालक मात्र भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागला. कळमना पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने गाई भरलेला ट्रक कळमना ठाण्यात नेण्यात आला. तेथे कागदोपत्री नोंद केल्यानंतर सर्व गाई आणि बैल धंतोलीतील गोरक्षण मध्ये नेण्यात आले. (प्रतिनिधी)