शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

‘पेम्फिगस’मुळे १५ टक्के मृत्यू : रज्जाक अहमद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST

‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे‘क्युटीकॉन’ला हजारावर त्वचारोग तज्ज्ञाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावात जन्मलेले डॉ. अहमद हे अमेरिकेच्या बोस्टन येथे केवळ ‘पेम्फिगस’ याच आजारावर वैद्यकीय सेवा देतात. त्यांनी या आजारावरचे जनुकदोष, प्रोटीन्स व औषधे शोधून काढल्याने जगात त्यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ मध्ये सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.‘पेम्फिगस’ या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने ‘अँटीबॉडी’ तयार करते. जी आपली त्वचा आणि श्लेष्म पडद्यामधील निरोगी पेशींवर हल्ला करते. डॉ. अहमद यांनी या आजारावर शोधून काढलेल्या औषधोपचाराने पुन्हा आजार होत नाही. या आजारावर त्यांनी आतापर्यंत ४०० शोधनिबंध सादर केले आहे. अमेरिकेत या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु भारतात मोठी संख्या आहे. यामुळे त्वचारोग तज्ज्ञाना या आजाराची व उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.वेळच डॉक्टर व रुग्णांकडे नाहीबदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे या पेशाला विक्रता आणि ग्राहक हे स्वरूप घेऊ पाहात आहे. डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारीत आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटत आहे,असेही डॉ. अहमद म्हणाले.परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. विक्रांत सावजी, डॉ. रिझवान हक, डॉ. ई.के मुकादम, डॉ. सुधीर मामीडवार, डॉ. सुशील पांडे, डॉ. किरण गोडसे, डॉ. मनोज वाघमारे, डॉ. मोहन शेंदरे, डॉ. प्राची मत्ते, डॉ. जयंत लांजेवार, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. जयेश मुखी, डॉ. नितीन बरडेआदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर