शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

‘पेम्फिगस’मुळे १५ टक्के मृत्यू : रज्जाक अहमद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST

‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे‘क्युटीकॉन’ला हजारावर त्वचारोग तज्ज्ञाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावात जन्मलेले डॉ. अहमद हे अमेरिकेच्या बोस्टन येथे केवळ ‘पेम्फिगस’ याच आजारावर वैद्यकीय सेवा देतात. त्यांनी या आजारावरचे जनुकदोष, प्रोटीन्स व औषधे शोधून काढल्याने जगात त्यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ मध्ये सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.‘पेम्फिगस’ या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने ‘अँटीबॉडी’ तयार करते. जी आपली त्वचा आणि श्लेष्म पडद्यामधील निरोगी पेशींवर हल्ला करते. डॉ. अहमद यांनी या आजारावर शोधून काढलेल्या औषधोपचाराने पुन्हा आजार होत नाही. या आजारावर त्यांनी आतापर्यंत ४०० शोधनिबंध सादर केले आहे. अमेरिकेत या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु भारतात मोठी संख्या आहे. यामुळे त्वचारोग तज्ज्ञाना या आजाराची व उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.वेळच डॉक्टर व रुग्णांकडे नाहीबदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे या पेशाला विक्रता आणि ग्राहक हे स्वरूप घेऊ पाहात आहे. डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारीत आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटत आहे,असेही डॉ. अहमद म्हणाले.परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. विक्रांत सावजी, डॉ. रिझवान हक, डॉ. ई.के मुकादम, डॉ. सुधीर मामीडवार, डॉ. सुशील पांडे, डॉ. किरण गोडसे, डॉ. मनोज वाघमारे, डॉ. मोहन शेंदरे, डॉ. प्राची मत्ते, डॉ. जयंत लांजेवार, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. जयेश मुखी, डॉ. नितीन बरडेआदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर