शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

१,४९६ कोटींची कन्हान नदी वळण योजनेच्या डीपीआरचे काम सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कन्हान नदी बोगदा वळण योजनेनंतर आता कन्हान वळण योजना हा नवा प्रकल्प आकारास येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कन्हान नदी बोगदा वळण योजनेनंतर आता कन्हान वळण योजना हा नवा प्रकल्प आकारास येत आहे. काटोल, नरखेड, सावनेर आणि कळमेश्वर तालुक्याचे भाग्य उजळणारा हा प्रकल्प १,४९६ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पातून या चारही तालुक्यांतील १२,९१४ हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. मात्र सध्यातरी या प्रकल्पाच्या डीपीआरचे काम सुरू आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार कन्हान नदीतील १५ टीसीएम पाणी महाराष्ट्राच्या वाट्याचे आहे. आंततराज्यीय नियोजनानुसार, यातील १५ टीसीएम पाण्यापैकी १० टीसीएम पाणी मध्यप्रदेशाच्या हद्दीतील जामघाट जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर नियंत्रित स्वरूपात १५ ऑक्टोबर ते ३० जून या काळात मिळणार आहे. उर्वरित ५ टीएमसी पाणी कन्हान जलविद्युत प्रकल्पाच्या खाली पण मध्यप्रदेशच्या हद्दीत कन्हानवर बॅरेज बांधून महाराष्ट्राला द्यायचे आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या क्षेत्रातील भूजलपातळी बरीच खोल आहे. या क्षेत्राची नोंद डार्क झोनमध्ये झाली आहे. पाण्याचा अन्य स्रोत उपलब्ध होण्यासारखा नसल्याने या भागाला अशा योजनांमधून पाणी देणे नितांत गरजेचे झाले आहे. या योजनेतून पाईपलाईनच्या माध्यमातून वितरण प्रणालीचे धोरण ठरले आहे.

...

जलसंधारण मंत्र्यांच्या दालनात बैठक होणार

या प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात लवकरच बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पाटील नागपूर जिलह्याच्या दौऱ्यावर आले असता आढावा बैठकीत कन्हान नदी वळण सिंचन योजनेचा विषय चर्चेला आला होता. या कामाला प्राधान्य दिल्यास काटोल, नरखेड, कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह पाणी सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. तसेच संत्रा उत्पादक क्षेत्रालाही याचा लाभ मिळणार आहे. सिंचनासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण होणार असल्यामुळे ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याची व त्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

...

अशी आहे योजना

१,४९६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात कन्हान नदीच्या कोची बॅरेजमधून पाणी लिफ्ट करून कोलार धरणात टाकले जाईल. या धरणाच्या साठ्यामधून तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वितरण करून १२ हजार हेक्टर कृषी क्षेत्र सिंचित करण्याचे या योजनेत प्रस्तावित आहे. सिंचन आणि औद्यागिक वापर हा मुख्य उद्देश आहे. सिंचनासाठी ८६.०४८ द.ल.घ.मी. पाणी दिले जाणार असून यात काटोल तालुक्यासाठी ९०४ हेक्टर, नरखेड तालुक्यासाठी ९,१९६ हेक्टर, सावनेर तालुक्यासाठी २,०५३ हेक्टर आणि कळमेश्वर तालुक्यासाठी ७६१ हेक्टर असे एकूण १२,९१४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे.

...

असे असेल पाण्याचे नियोजन

एकूण पाणी वापर : ९२.२३ द.ल.घ.मी.

सिंचन वापर : ८६.०४८ द.ल.घ.मी.

पाणी पुरवठा योजना : ०.८९ द.ल.घ.मी.

औद्योगिक वापर : १.००० द.ल.घ.मी.

बाष्पीभवन व्यय : ४.२९६ द.ल.घ.मी.

...

कोलारची उंचा वाढणार

या प्रकल्पासाठी कोलार धरणाची उंची ७.५७ मीटरने वाढवावी लागणार आहे. यातून संचय पातळी ३७१.५७० मीटर होईल. या वाढीव पातळीत ९०.६६१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा निर्माण होणार आहे. कोलारचे सध्याचे मूळ बुडीत क्षेत्र ५८५ हेक्टर आहे. उंची वाढणार असल्याने या धरणासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.

...