शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

१४,४०० मेगावॉट सौर वीजनिर्मिती करणारच; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:26 IST

राज्याचे सौर ऊर्जा निर्मितीचे धोरण असून १४ हजार ४०० मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारच. एवढ्यामोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्दे२५ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे नियोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर: राज्याचे सौर ऊर्जा निर्मितीचे धोरण असून १४ हजार ४०० मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारच. यापैकी ७ हजार मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती सध्या सुरु आहे. एवढ्यामोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २५ हजार मेगावॉट पारंपरिक वीजनिर्मितीचे नियोजनही के ले जात आहे. अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.सदस्य आनंदराव पाटील, हेमंत टकले, डॉ. नीलम गोºहे, भाई जगताप व अन्य आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती संच बंद करावे लागत आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, सप्टेंबरमध्ये कोळसा खाणीमध्ये पाणी साचल्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटामुळे पुरेसा कोळसा पुरवठा झाला नाही. केवळ महानिर्मितीच नव्हे तर खाजगी वीजनिर्मिती कंपन्यांनाही कोळसा मिळाला नाही. परिणामी एक आठवडाभर भारनियमन करावे लागले. पण आता ५ ते ७ दिवसाचा कोळसा साठा उपलब्ध आहे. २० ते २२ दिवसांचा साठा उपलब्ध राहावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारनियमन होणार नाही. राज्याने सौर ऊर्जचे धोरण आणले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून वीजनिर्मितीवर राज्याचा भर आहे. अणु ऊर्जा प्रकल्प हा विषय केंद्र शासनाचा असून केंद्र शासनाने अणुऊर्जा प्रकल्प निर्माण केले तर राज्याला गरज असल्याचे केंद्र शासनाला सांगण्यात येईल, असेही ऊजामंत्र्यांनी सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.सध्या राज्याकडे २०२० -२०२१ पर्यंत पुरेल एवढी वीज असून २०३० पर्यंत लागणाºया २५ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे नियोजन शासन करीत आहे. परदेशातील कोळसा वापरण्याबद्दलच्या आ. जयंत पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ऊजामंत्री म्हणाले, आयात केलेल्या परदेशी कोळसा वापरावर केंद्र शासनाने बंधन घातले आहे. पण २० टक्के परदेशी व ८० टक्के वेकोलिचा कोळसा मिसळण्यासाठी केंद्राला परवानगी मागू. भाई गिरकर यांच्यासह अन्य आमदारांनी या प्रश्नाच्या चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७