शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

दीक्षाभूमी विकासाकरिता वायएफसी-बीबीजी कंपनीला १३० कोटी रुपयांचा कार्यादेश जारी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: November 8, 2023 14:26 IST

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

नागपूर : आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता हरयाणामधील गुडगाव येथील वायएफसी-बीबीजी या संयुक्त उपक्रम कंपनीला १३० कोटी रुपयाच्या कामांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

दीक्षाभूमीच्या सर्वांगीन विकासाकरिता ॲड. शैलेश नारनवरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, प्राधिकरणच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजय चिमुरकर यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, प्राधिकरणचे अनुभवी ॲड. गिरीश कुंटे यांनी प्रतिज्ञापत्रातील महत्वपूर्ण मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

राज्य सरकारने गेल्या ३१ मार्च रोजी २०० कोटी ३१ लाख रुपयाच्या दीक्षाभूमी विकास प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर प्राधिकरणने ई-टेंडर नोटीस जारी केली. या टेंडरमध्ये पाच कंपन्यांनी सहभागी होऊन बोली सादर केली होती. त्यापैकी तीन कंपन्या तांत्रिक मूल्यांकनासाठी पात्र ठरल्या. त्यांच्या वित्तीय बोली उघडल्यानंतर वायएफसी-बीबीजी कंपनीने सर्वात कमी वित्तीय बोली लावल्याचे आढळून आले. मुख्यमंत्री व प्राधिकरण अध्यक्षांनी त्या बोलीला मान्यता दिली. त्यामुळे या कंपनीला गेल्या २० ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी विकासाचे कंत्राट देण्यात आले, असे ॲड. कुंटे यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्राधिकरणचे हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतले व अन्य मुद्यांवर विचार करण्यासाठी प्रकरणावर येत्या १३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे

ॲड. नारनवरे यांनी दीक्षाभूमीचा विकास का आवश्यक आहे, याकडे याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे. दीक्षाभूमी येथे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिवस यासह विविध कार्यक्रम होतात. त्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येत भाविक येतात. परंतु, या ठिकाणी निवास, भोजन, स्वच्छतागृह, परिवहन इत्यादी आवश्यक सुविधा नसल्यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीHigh Courtउच्च न्यायालय