शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नागपूर जिल्ह्यात १२५ कोटींच्या पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:29 IST

नागपूर जिल्ह्यातील १२५. २५ कोटींच्या सहा मोठ्या पाणीपुरवठा योजनांना येत्या चार-पाच दिवसात शासन मंजुरी देणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मुुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिकापालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यशचार-पाच दिवसात शासनातर्फे मिळणार मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२५. २५ कोटींच्या सहा मोठ्या पाणीपुरवठा योजनांना येत्या चार-पाच दिवसात शासन मंजुरी देणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मुुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मजिप्राचे सचिव वेल रासू, पाणीपुरवठा प्रधान सचिव घनश्याम गोयल, मजिप्राचे अधीक्षक अभियंता सतीश सुशीर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी सकारात्मक भूमिका घेतली तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.कामठी तालुक्यातील बिडगाव तरोडी पाणीपुरवठा योजना ५.९३ कोटी रुपयांच्या निविदेला एमएस कार्यालय निविदा कमिटीकडून मंजुरी घेण्यात यावी. तसेच भिलगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बचतीच्या रकमेतून खसाळा गावाकरिता अतिरिक्त वितरण व्यवस्थोला मंजुरी देण्यात येणार आहे. ही योजना २१.६४ कोटींची असून अतिरिक्त वितरण व्यवस्थेला ५२ लाख रुपये खर्च येणार आहे.नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर २७५ किमी वितरण व्यवस्थेंतर्गत अतिरिक्त टाकलेल्या १० किमी वितरण व्यवस्थेला मंजुरी मिळणार आहे. तसेच बोखारा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पीयूसी पाईप लाईन बदलविण्याच्या ८६ लक्ष रुपयांच्या वितरण व्यवस्थेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे. टाकळघाट पाणीपुरवठा योजना १३.५० कोटी योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल. ४४ कोटींच्या नीलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. कामठी शहर पाणीपुरवठा योेजना (२७.८७ कोटी) व कामठी कॅन्टॉनमेंट पाणीपुरवठा योजना (९.४५ कोटी) प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आढावा बैठकी घेतल्या. यात अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना बंद असल्याचे लक्षात आले. त्या योजनांची माहिती आजच्या बैठकीत मागविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील लहानलहान पाणीपुरवठा योजना केवळ साध्या दुरुस्तीसाठी १५ वर्षांपासून बंद असल्याचे आढळले. या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये खर्च येणार असून या खर्चालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्याचा निर्णय झाला. सावनेर तालुक्यात २२ योजना, कळमेश्वर तालुक्यात ९ योजना, मौदा तालुक्यात निमखेडा येथील एक योजना, रामटेक तालुक्यात परसोडा येथील एक योजना, नागपूर तालुक्यात ११ पाणीपुरवठा योजना व कामठी तालुक्यातील ८ पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. बैठकीत या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करून त्या योजना सुरु करण्याचा निर्णय झाला.

 

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर