शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपूर शहरातील १२० पाणी टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:19 IST

नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे पाणीपुरवठ्यासाठी टँक र खर्चात वर्षाला १० ते १२ कोटींची बचत होणार आहे.

ठळक मुद्देमनपाची वर्षाला १२ कोटींची बचत : हुडकेश्वर -नरसाळा टँकरमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे पाणीपुरवठ्यासाठी टँक र खर्चात वर्षाला १० ते १२ कोटींची बचत होणार आहे. शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या ३४६ टँकर आहेत. यावर दरवर्षी २८ कोटी रुपये खर्च होतो. १२० टँकर बंद के ल्याने खर्चात मोठी बचत होणार आहे.शहरात जलवाहिनी नसलेल्या भागामध्ये शासकीय निधी, अमृत योजना, विशेष निधी व नासुप्रद्वारे अनेक ठिकाणी जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहेत. मनपाद्वारे या जलवाहिन्या चार्ज करून नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. नासुप्रद्वारे टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांपैकी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोनअंतर्गत ९५५ अभिन्यासापैकी ८७६ अभिन्यास मनपातर्फे चार्ज करून सुमारे १७,००० नळजोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे या भागातील टँकर्सची मागणी कमी झाली. विशेष म्हणजे मागील वर्षी नागपूर शहरास नव्याने जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर -नरसाळा या भागात शासकीय निधी अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. या भागातील जलवाहिन्या चार्ज करून सुमारे ८,८४० नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. हुडकेश्वर नरसाळा भागामध्ये ७६ टँकरद्वारे दररोज ५३० फेऱ्या करण्यात येत होत्या. जलवाहिन्या चार्ज झाल्याने ९० टक्के भाग टँकरमुक्त झाला आहे. मार्च २०२० अखेरीस संपूर्ण हुडकेश्वर- नरसाळा टँकरमुक्त करण्याचे मनपाचे लक्ष्य आहे.आणखी १०० टँकर बंद करणारमनपा लवकरच आणखी १०० टँकर बंद करणार आहे. नासुप्रद्वारे वांजरा येथे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी चार्ज झाल्यास कामठी मार्गावरील उप्पलवाडी, शिवनगर, धम्मदीपनगर, डायमंडनगर, हस्तीनापूर, बंधू सोसायटी, भीमवाडी आदी भागातील नागरिकांना नळ कनेक्शन दिल्यास या भागातील टँकरच्या ६० ते ७० फेऱ्या कमी होतील. नासुप्रद्वारे नारा व कळमना भागातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. येत्या दोन महिन्यात दोन्ही भागातील टाक्या मनपाकडे हस्तांतरित होतील. त्यादृष्टीने सदर भागात अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या टाक्या चार्ज झाल्यावर नारा कमांड एरिया अंतर्गत समतानगर, पांजरा येथील टँकरच्या दररोजच्या ७० ते ८० फेऱ्या कमी होतील. कळमना टाकी चार्ज झाल्यास राजलक्ष्मीनगर, पार्वतीनगर, देवीनगर, गुलशननगर, राजीव गांधी नगर, कळमना या भागातील टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे येथील दररोजच्या १८० फेऱ्या कमी होतील. अमृत योजनेअंतर्गत लकडगंज झोन अंतर्गत सुरू असलेले जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास दररोज ४५० फेऱ्या कमी होतील. त्यामुळे आणखी १०० टँकर कमी होणार आहेत.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater transportजलवाहतूक