शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

इंधन दरवाढीचा १२ कोटींचा बोजा; नागपूर परिवहन विभाग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 06:00 IST

Nagpur news आधीच तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची बस सेवा कोरोना व इंधन दरवाढीमुळे आणखीच अडचणीत आली आहे. इंधन दरवाढीमुळे महिन्याला १ कोटींचा, तर वर्षाला १२ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

ठळक मुद्देमनपावर आर्थिक अडचणीत अतिरिक्त भार

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आधीच तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची बस सेवा कोरोना व इंधन दरवाढीमुळे आणखीच अडचणीत आली आहे. इंधन दरवाढीमुळे महिन्याला १ कोटींचा, तर वर्षाला १२ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच क्षेत्रांत आर्थिक घडी विस्कटली आहे. याचा फटका मनपालाही बसला. त्यात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मार्चपूर्वी डिझेलचा दर ६५ रुपये होता तो आता ८१ रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे मनपाचा इंधनापोटी होणारा खर्च वाढला आहे. कोरोनानंतर आतापर्यंत डिझेलच्या दरात सुमारे १५ ते १६ रुपयांची वाढ झाल्याने ७ कोटींपर्यंत होत असलेला तोटा आता ८ कोटीवर जात आहे. यात वर्षाला १२ कोटींची भर पडणार आहे.

मार्चपूर्वी ४३७ बसेस शहरात धावत होत्या. दररोज १.५० लाख प्रवासी प्रवास करीत होते, तर तिकिटातूत २० ते २२ लाख जमा होत होते. सध्या १७२ बसेस सुरू असून दररोज जवळपास ५१ हजार प्रवासी प्रवास करतात, तर तिकिटातून ८ ते ९ लाख जमा होत आहेत.

त्यामुळे परिवहन उपक्रमाने आता डिझेलवरील बसेस हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला असून सद्यस्थितीत सेवा देत असलेल्या डिझेलवरील बसेस सीएनजीत रूपांतरित करण्यात येणार आहेत. यापुढे विद्युत बस व सीएनजीवर चालणाऱ्या बसेस शहरात धावतील असे नियोजन करण्यात आले आहे.

सीएनजीमध्ये परिवर्तन संथच

परिवहन उपक्रमाकडे सध्या ४३७ बसेस आहेत. त्यापैकी ६ बसेस या विद्युत बस असून सीएनजीवर सध्या ५५ बस आहेत. इंधनापोटी होत असलेल्या खर्चात बचत व्हावी, या हेतूने टप्प्या-टप्प्याने सर्व बस सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्याचे नियोजन होते. तसेच विद्युत बसची संख्या वाढविण्याचे नियोजन होते. डिसेंबर २०२० पर्यंत १०० बस सीएनजीवर धावणार होत्या. परंतु ही प्रक्रिया कमालीची संथ असल्याने मनपाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्षच आहे.

 मनपा ताफ्यातील बसेस

विद्युत बस :             ६

सीएनजी बस : ५५

डिझेल बस : ३७६

एकूण बसेस : ४३७

दर महिन्याचा तोटा वाढला

परिवहन विभागावर दर महिन्याला १३ कोटींचा खर्च होतो, तर तिकिटातून ६ ते ७ कोटी जमा होतात. जमा-खर्चाचा विचार केला तर ६ ते ७ कोटींचा तोटा मनपाला सोसावा लागत लागतो. इंधन दरवाढीमुळे तोटा १ कोटीने वाढण्याची शक्यता परिवहन समन्वयक रवींद्र पागे यांनी व्यक्त केली.

 डिझेलपेक्षा सीएनजीचे दर कमी

सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याने परिवहनचा तोटा वाढत आहे. त्यामुळे डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असल्याने डिझेल गाड्या सीएनजीमध्ये रूपांतरित करणे व डिझेलच्या बसपेक्षाही प्रदूषण न करणाऱ्या विद्युत बसची संख्या वाढवून इंधनावरील खर्चात कपात करण्याच्या धोरणाला धक्का लागला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका