शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात १०८७ वीज खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:45 IST

शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : महावितरण-मनपा अधिकाऱ्यांची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.२००१-०२ मध्ये शहरात आयआरडीपीअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. यादरम्यान अनेक वीज खांब रस्त्यांच्या मध्ये आले. मध्ये मनपा व महावितरणने संयुक्तपणे खांब हटविण्यासाठी सर्वे केला. २०११ मध्ये ९१.५ कोटीचे इस्टीमेट तयार झाले. मनपा व महावितरण दोघेही अर्धा अर्धा खर्च उचलणार होते. महावितरणने विद्युत नियामक आयोगाच्या माध्यमतून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षापर्यंत वीज बिलाच्या माध्यमतून वसुली केली. दुसरीकडे मनपाने केवळ २०.५ कोटी रुपये खर्च केले. ४१ कोटीचे काम होताच खांब हटविण्याचे काम बंद करण्यात आले. ५० कोटीचे काम प्रशासनिक कामात अडकले. आता मनपा असा दावा करीत आहे की, त्यांना सरकारकडून अनुदान मिळाले आहे आणि महावितरणला इस्टीमेट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.महावितरणनेही सांगितले आहे की, इस्टीमेट तयार केले जात आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांची यादी वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने महावितरणला सोपविली असून, ते हटविण्यासाठी मदत मागितली आहे. मनपा व महावितरणच्या एकूणच कामाची गती पाहता खांब हटविण्याचे काम तातडीने होणार नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण