शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारातून १० हजार झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST

नागपूर : आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार हा नातलगांसाठी दु:खाचा व भावनिकतेचा क्षण असताे. यावेळी हिशेब महत्त्वाचा नसताे. मात्र पर्यावरणाचा हिशेब ...

नागपूर : आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार हा नातलगांसाठी दु:खाचा व भावनिकतेचा क्षण असताे. यावेळी हिशेब महत्त्वाचा नसताे. मात्र पर्यावरणाचा हिशेब आता प्रत्येकाला ठेवणे गरजेचे झाले आहे. या हिशेबाची नागपूरकरांना बऱ्यापैकी जाणीव झाली असून जन सहकार्याने पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची चळवळ यशस्वी ठरत आहे. २०२०-२१ या सरलेल्या आर्थिक वर्षाचा हिशेब केल्यास शहरातील घाटांवर हाेणाऱ्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे १० हजार झाडांना जीवदान देणे शक्य झाले आहे.

शेतातील कचऱ्यापासून माेक्षकाष्ठ निर्माण करून पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते ठरलेले विजय लिमये यांच्या प्रयत्नांना महापालिकेच्या सहकार्याने चांगले यश मिळायला लागले आहे. लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विविध दहनघाटांवर ५००० पेक्षा जास्त मृतदेहांचे संपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करून लाकडाचा उपयाेग कमी केला आणि गरजेनुसार दहा हजार झाडांची कत्तल राेखणे शक्य झाले. बीज लावण्यापासून झाडाची पूर्ण वाढ हाेइपर्यंत किमान २००० रुपये खर्च गृहीत धरल्यास या झाडांना वाचवून आपण एक काेटी रुपयांची बचतही केली आहे. विजय लिमये यांनी शेतातील काडीकचऱ्याचा उपयाेग करून मृतदेह ज्वलनासाठी माेक्षकाष्ठाची निर्मिती केली. त्यांनी सांगितले, गेल्या आर्थिक वर्षात ५००० मृतदेहांचा अग्निसंस्कार करण्यासाठी शहरातील विविध स्मशानघाटावर १२५० टन माेक्षकाष्ठ उपलब्ध करण्यात आले. शेतकऱ्यांचा कचरा विकत घेऊन त्यांनाही आर्थिक लाभ देणे शक्य झाले आहे. एवढेच नाही तर एवढ्या माेठ्या प्रमाणात माेक्षकाष्ठाची निर्मिती करून ग्रामीण भागातील ५० अकुशल कामगारांच्या हाताला किमान वर्षभर काम मिळवून देण्यात यश आले आहे.

हे सर्व घडत असताना, हवेचे प्रदूषण हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. शहरातील सहा स्मशान घाटावर पर्यावरणपूरक अंत्यविधीची सुविधा उपलब्ध केल्यामुळे येथील हवेचे प्रदूषण ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्यात यशस्वी झाल्याचा दावा लिमये यांनी केला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासह प्रदूषण कमी करून पर्यावरण संरक्षणाची साखळी पूर्ण झाली आहे.

पर्यावरणपूरक अंत्यविधी हा उपक्रम नागपुरात पाच वर्षांपूर्वी सुरू केला. पर्यावरणप्रेमी नागपूरकरांनी या उपक्रमास सुरवातीपासूनच मनापासून सहकार्य केले आहे. त्यामुळे इतक्या वर्षात जवळपास लाखो झाडांना जीवदान देण्यात यशस्वी झालो आहोत. यासाठी नागपूरकरांचे कौतुकच आहे. इतर शहरातील लोकांनी नागपूर शहराचा आदर्श घेऊन झाडे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी योगदान द्यावे.

- विजय लिमये, पर्यावरण मित्र