शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारातून १० हजार झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST

नागपूर : आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार हा नातलगांसाठी दु:खाचा व भावनिकतेचा क्षण असताे. यावेळी हिशेब महत्त्वाचा नसताे. मात्र पर्यावरणाचा हिशेब ...

नागपूर : आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार हा नातलगांसाठी दु:खाचा व भावनिकतेचा क्षण असताे. यावेळी हिशेब महत्त्वाचा नसताे. मात्र पर्यावरणाचा हिशेब आता प्रत्येकाला ठेवणे गरजेचे झाले आहे. या हिशेबाची नागपूरकरांना बऱ्यापैकी जाणीव झाली असून जन सहकार्याने पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची चळवळ यशस्वी ठरत आहे. २०२०-२१ या सरलेल्या आर्थिक वर्षाचा हिशेब केल्यास शहरातील घाटांवर हाेणाऱ्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे १० हजार झाडांना जीवदान देणे शक्य झाले आहे.

शेतातील कचऱ्यापासून माेक्षकाष्ठ निर्माण करून पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते ठरलेले विजय लिमये यांच्या प्रयत्नांना महापालिकेच्या सहकार्याने चांगले यश मिळायला लागले आहे. लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विविध दहनघाटांवर ५००० पेक्षा जास्त मृतदेहांचे संपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करून लाकडाचा उपयाेग कमी केला आणि गरजेनुसार दहा हजार झाडांची कत्तल राेखणे शक्य झाले. बीज लावण्यापासून झाडाची पूर्ण वाढ हाेइपर्यंत किमान २००० रुपये खर्च गृहीत धरल्यास या झाडांना वाचवून आपण एक काेटी रुपयांची बचतही केली आहे. विजय लिमये यांनी शेतातील काडीकचऱ्याचा उपयाेग करून मृतदेह ज्वलनासाठी माेक्षकाष्ठाची निर्मिती केली. त्यांनी सांगितले, गेल्या आर्थिक वर्षात ५००० मृतदेहांचा अग्निसंस्कार करण्यासाठी शहरातील विविध स्मशानघाटावर १२५० टन माेक्षकाष्ठ उपलब्ध करण्यात आले. शेतकऱ्यांचा कचरा विकत घेऊन त्यांनाही आर्थिक लाभ देणे शक्य झाले आहे. एवढेच नाही तर एवढ्या माेठ्या प्रमाणात माेक्षकाष्ठाची निर्मिती करून ग्रामीण भागातील ५० अकुशल कामगारांच्या हाताला किमान वर्षभर काम मिळवून देण्यात यश आले आहे.

हे सर्व घडत असताना, हवेचे प्रदूषण हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. शहरातील सहा स्मशान घाटावर पर्यावरणपूरक अंत्यविधीची सुविधा उपलब्ध केल्यामुळे येथील हवेचे प्रदूषण ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्यात यशस्वी झाल्याचा दावा लिमये यांनी केला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासह प्रदूषण कमी करून पर्यावरण संरक्षणाची साखळी पूर्ण झाली आहे.

पर्यावरणपूरक अंत्यविधी हा उपक्रम नागपुरात पाच वर्षांपूर्वी सुरू केला. पर्यावरणप्रेमी नागपूरकरांनी या उपक्रमास सुरवातीपासूनच मनापासून सहकार्य केले आहे. त्यामुळे इतक्या वर्षात जवळपास लाखो झाडांना जीवदान देण्यात यशस्वी झालो आहोत. यासाठी नागपूरकरांचे कौतुकच आहे. इतर शहरातील लोकांनी नागपूर शहराचा आदर्श घेऊन झाडे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी योगदान द्यावे.

- विजय लिमये, पर्यावरण मित्र