शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिवाळी अधिवेशनाची सोय; १० स्पेशल ट्रेनची मुदत वाढली

By नरेश डोंगरे | Updated: November 23, 2023 15:09 IST

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन निर्णय : हिवाळी अधिवेशनातील पाहुण्यांची होईल सोय

नागपूर :नागपूर, विदर्भातून मुंबई आणि पुणे मार्गावर धावणाऱ्या १० विशेष रेल्वे गाड्यांचा (स्पेशल ट्रेन) मुदत अवधी आणखी काही दिवस वाढविण्यात आला आहे. मुदत अवधी आणि फेऱ्या वाढविण्यात आलेल्या ट्रेनमध्ये मुंबई सीएसएमटी नागपूर आणि नागपूर पुणे साप्ताहिक स्पेशलचाही समावेश आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या मुंबई-पुण्यासह, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो पाहुण्यांना सोयीचे होणार आहे.

ट्रेन नंबर ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर ही विशेष गाडी काही महिन्यांपूर्वी सुुरू करण्यात आली होती. तिची मुदत २० नोव्हेंबरला संपली. ती आता तशीच सुरू ठेवून २८ डिसेंबरपर्यंत धावणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. अर्थात तिच्या ११ फेऱ्या वाढल्या आहेत. त्याच प्रमाणे ट्रेन नंबर ०२१४० नागपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक या स्पेशल ट्रेनची मुदत २१ नोव्हेंबरला संपली ती आता पुन्हा ११ फेऱ्या जास्तीच्या लावत ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

या दोन्ही गाड्यांना आतापर्यंत जे थांबे होते, ते तसेच राहिल. शिवाय चाळीसगाव आणि जळगाव या रेल्वेस्थानकावरही या दोन गाड्यांना नवीन निर्णयानुसार थांबे देण्यात आले आहे. ट्रेन नंबर ०२१४४ नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या वाढविण्यात आल्या असून ही गाडी आता २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०२१४३ पुणे - नागपूर साप्ताहिक स्पेशलच्याही सहा फेऱ्या वाढविण्यात आल्या असून ती आता २९ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

ट्रेन नंबर ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस -बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडी आता २८ नोव्हेंबर ऐवजी २६ डिसेंबरपर्यंत तर, ट्रेन नंबर ०११२८ बल्लारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक स्पेशल २७ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. अशाच प्रकारे ०१४३९ पुणे - अमरावती ३१ डिसेंबरपर्यंत आणि अमरावती पुणे द्वी साप्ताहिक १ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे.

६० फेऱ्या वाढल्या

विशेष म्हणजे, सध्या दिवाळीला गेलेली मंडळी आपापल्या गावी परतणे सुरू असल्याने बहुतांश रेल्वेगाड्यांमधील गर्दी दोन आठवड्यांपासून जशीच्या तशी आहे. अशात या सर्व गाड्यांच्या एकूण ६० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.दुसरे म्हणजे, ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात ठिकठिकाणच्या आणि खास करून मुंबई, पुण्यासह मराठवाड्यातील मंत्री, आमदारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत नागपुरात येतात. शिवाय राज्यभरातील मोर्चेकरी, आंदोलकही पोहचतात. उपरोक्त गाड्यांचा अवधी वाढल्याने त्या सर्वांना सोयीचे होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर