शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

नागपुरात १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:11 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे पंचनामे सुरुच, गहू, हरबराचे सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.चार दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. विदर्भासह नागपूर जिल्हाही यातून सुटला नाही. गारपिटीमुळे काटोल, नरखेड, रामटेक, मौदासह जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला. जवळपास १०,२६० हेक्टरवरील गहू, हरभरा आदि पिकांसह संत्रा,मोसंबी, केळी, आंबा ,आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २७६ गावांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात ११ तारखेला झालेल्या अवकाळी पावसात केवळ मौदा आणि नागपूर ग्रामीण भागालाच फटका बसला होता. तेव्हा जवळपास २०९५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. परंतु १२ तारखेला पुन्हा गारपीट झाली. तेव्हा नरखेड, काटोल, रामटेक आदी भागाला चांगलाच फटका बसला जवळपास ८२०० हेक्टरवरील पिकांना नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. तेव्हा २४ तासात पंचनामे सादर करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळपासूनच फिरत आहेत. पंचनामे करीत आहेत. सायंकाळपर्यंत झालेल्या पाहणीनुसार १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर