शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

नागपुरात १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:11 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे पंचनामे सुरुच, गहू, हरबराचे सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.चार दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. विदर्भासह नागपूर जिल्हाही यातून सुटला नाही. गारपिटीमुळे काटोल, नरखेड, रामटेक, मौदासह जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला. जवळपास १०,२६० हेक्टरवरील गहू, हरभरा आदि पिकांसह संत्रा,मोसंबी, केळी, आंबा ,आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २७६ गावांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात ११ तारखेला झालेल्या अवकाळी पावसात केवळ मौदा आणि नागपूर ग्रामीण भागालाच फटका बसला होता. तेव्हा जवळपास २०९५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. परंतु १२ तारखेला पुन्हा गारपीट झाली. तेव्हा नरखेड, काटोल, रामटेक आदी भागाला चांगलाच फटका बसला जवळपास ८२०० हेक्टरवरील पिकांना नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. तेव्हा २४ तासात पंचनामे सादर करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळपासूनच फिरत आहेत. पंचनामे करीत आहेत. सायंकाळपर्यंत झालेल्या पाहणीनुसार १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर