शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 06:30 IST

‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी! नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!

- भाऊसाहेब चासकर‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!त्यातून गावखेड्यातली मुले निसर्गाच्या साथीत रमणारी.त्यांना बंद वर्गखोलीत बसून शिक्षकांची भाषणे ऐकणे नकोसे होते.मन रमत नाही. मग शाळेत यावेसे वाटत नाही. शेत खुणावते.डोंगर खुणावतात. झाडे बोलावतात. न कळणारे इंग्रजी घोकण्यापेक्षामोकळ्या रानात गुरे वळायला जाणे जास्त मजेचेच असते....पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेडोपाडीची, वाडीवस्त्यांवरची मुलेशहरी कॉन्व्हेण्टवाल्यांना टक्कर देत डिजिटल जगाच्या सफरीवर निघाली आहेत. या शाळांच्या भिंती चित्रांनी सजल्या आहेत.आधीच्या ओसाड अंगणात झाडांची, पक्ष्यांची गजबज आहे.शाळेत कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर, टॅब्लेट, लॅपटॉप आणिवेब कॅमेरे आले आहेत.अनेक शाळांनी स्वत:च्या व्हर्च्युअल लॅब, डिजिटल स्टुडिओ उभारले आहेत. आॅगमेण्टेड रिअ‍ॅलिटी बुक्स वापरून खुर्द - बुद्रुकमधल्या वर्गांत पाठ्यपुस्तके जिवंत होऊ लागली आहेत.स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप अशी साधी साधने वापरूनही मुले जगाशी जोडली जात आहेत.... ही जादू कुणी केली?धडपड्या तंत्रस्नेही तरुण शिक्षकांनी !!!पदरमोड करून, मदत मागून, गावातून लोकसहभाग मिळवूनया शिक्षकांनी आपापल्या शाळांचा ‘सरकारी’ नक्षाचबदलून टाकला आहे.इटस ओके, नॉट टू बी ओके!

- आलिया भट‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे.- हल्ली मी हे लक्षात ठेवते.आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल.आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात.त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट! मग आपण काय करायचं?आपलं असं एक इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवील त्या दिशेने जायचं.जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा.सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले कीत्या निर्णयांतली सगळी गंमतनिघून जाते.

शेतात जेव्हा वीज  पिकते - समीर मराठेधुंडी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातलं तिनेकशे उंबºयांचं छोटंसं खेडं.गावात कोणाकडेच मोठी शेती नाही. कोणी श्रीमंत नाही. बहुतेकांकडे दोन-तीन एकर शेती.पण याच गावातल्या काही शेतकºयांनी एकत्र येऊन एक जगावेगळं पीक आपल्या जमिनीच्या तुकड्यांवर लावलं आहे. त्याला बियाणांची, खतांची, कीटकनाशकांची,मजुरांची कसलीच गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, पुराचा फटका बसत नाही, रोगराईनं हे पीक मरत नाही. दुष्काळही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. उलट दुष्काळ उत्तम.अंग भाजून काढणारं ऊन या पिकाला भलतं मानवतं.धुंडीच्या शेतकºयांनी लोखंडी खांब रोवून वर टांगलेल्याया अनोख्या शेतीमध्ये भारतीय शेतकºयांचं नशीब बदलण्याची जादू आहे.धुंडीतले अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?- तर वीज!सौरऊर्जा.स्वत:च्या वापरापुरती वीज सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे;पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी सहकारी तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं आणिजगातलंही पहिलं गाव आहे.

अक्षय पात्र

- सायली राजाध्यक्षकृष्णाच्या थाळीतलं अन्न कधी संपत नसे म्हणतात.मी अशाच एका स्वयंपाकघरात पोहचले होते. हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये आशिया खंडातलं हे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे. इथं रोज सकाळी १२००० ते १५००० किलो गरमागरम भात शिजतो.तब्बल २५ हजार लिटर सांबार तयार होतं. या सांबारासाठी ८००० ते ९००० किलो भाज्यांचा वापर केला जातो. ज्या दिवशी गव्हाचं पायसम किंवा हुग्गी (एक प्रकारचा शिरा) असतं,त्या दिवशी इथं शिजलेल्या साजूक तुपातल्या हुग्गीचं वजन असतं ७०००० किलो.स्वयंपाकाला सुरुवात होते पहाटे साडेतीन वाजता. साडेआठच्या आत सगळे पदार्थ तयार असतात. अवघ्या चार तासांत तयार झालेलं हे अन्न मग इन्सुलेटेड वाहनांमधून हुबळीच्या जवळच्या शाळांच्या दिशेनं धावायला लागतं.ठरवून दिलेल्या वेळात एकूण ८०७ शाळांपर्यंत पोहचतं.त्या शाळांमधली १,३६,१११ मुलं रोज दुपारी अंगतपंगत करून जेवतात.