शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 06:30 IST

‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी! नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!

- भाऊसाहेब चासकर‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!त्यातून गावखेड्यातली मुले निसर्गाच्या साथीत रमणारी.त्यांना बंद वर्गखोलीत बसून शिक्षकांची भाषणे ऐकणे नकोसे होते.मन रमत नाही. मग शाळेत यावेसे वाटत नाही. शेत खुणावते.डोंगर खुणावतात. झाडे बोलावतात. न कळणारे इंग्रजी घोकण्यापेक्षामोकळ्या रानात गुरे वळायला जाणे जास्त मजेचेच असते....पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेडोपाडीची, वाडीवस्त्यांवरची मुलेशहरी कॉन्व्हेण्टवाल्यांना टक्कर देत डिजिटल जगाच्या सफरीवर निघाली आहेत. या शाळांच्या भिंती चित्रांनी सजल्या आहेत.आधीच्या ओसाड अंगणात झाडांची, पक्ष्यांची गजबज आहे.शाळेत कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर, टॅब्लेट, लॅपटॉप आणिवेब कॅमेरे आले आहेत.अनेक शाळांनी स्वत:च्या व्हर्च्युअल लॅब, डिजिटल स्टुडिओ उभारले आहेत. आॅगमेण्टेड रिअ‍ॅलिटी बुक्स वापरून खुर्द - बुद्रुकमधल्या वर्गांत पाठ्यपुस्तके जिवंत होऊ लागली आहेत.स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप अशी साधी साधने वापरूनही मुले जगाशी जोडली जात आहेत.... ही जादू कुणी केली?धडपड्या तंत्रस्नेही तरुण शिक्षकांनी !!!पदरमोड करून, मदत मागून, गावातून लोकसहभाग मिळवूनया शिक्षकांनी आपापल्या शाळांचा ‘सरकारी’ नक्षाचबदलून टाकला आहे.इटस ओके, नॉट टू बी ओके!

- आलिया भट‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे.- हल्ली मी हे लक्षात ठेवते.आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल.आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात.त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट! मग आपण काय करायचं?आपलं असं एक इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवील त्या दिशेने जायचं.जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा.सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले कीत्या निर्णयांतली सगळी गंमतनिघून जाते.

शेतात जेव्हा वीज  पिकते - समीर मराठेधुंडी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातलं तिनेकशे उंबºयांचं छोटंसं खेडं.गावात कोणाकडेच मोठी शेती नाही. कोणी श्रीमंत नाही. बहुतेकांकडे दोन-तीन एकर शेती.पण याच गावातल्या काही शेतकºयांनी एकत्र येऊन एक जगावेगळं पीक आपल्या जमिनीच्या तुकड्यांवर लावलं आहे. त्याला बियाणांची, खतांची, कीटकनाशकांची,मजुरांची कसलीच गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, पुराचा फटका बसत नाही, रोगराईनं हे पीक मरत नाही. दुष्काळही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. उलट दुष्काळ उत्तम.अंग भाजून काढणारं ऊन या पिकाला भलतं मानवतं.धुंडीच्या शेतकºयांनी लोखंडी खांब रोवून वर टांगलेल्याया अनोख्या शेतीमध्ये भारतीय शेतकºयांचं नशीब बदलण्याची जादू आहे.धुंडीतले अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?- तर वीज!सौरऊर्जा.स्वत:च्या वापरापुरती वीज सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे;पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी सहकारी तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं आणिजगातलंही पहिलं गाव आहे.

अक्षय पात्र

- सायली राजाध्यक्षकृष्णाच्या थाळीतलं अन्न कधी संपत नसे म्हणतात.मी अशाच एका स्वयंपाकघरात पोहचले होते. हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये आशिया खंडातलं हे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे. इथं रोज सकाळी १२००० ते १५००० किलो गरमागरम भात शिजतो.तब्बल २५ हजार लिटर सांबार तयार होतं. या सांबारासाठी ८००० ते ९००० किलो भाज्यांचा वापर केला जातो. ज्या दिवशी गव्हाचं पायसम किंवा हुग्गी (एक प्रकारचा शिरा) असतं,त्या दिवशी इथं शिजलेल्या साजूक तुपातल्या हुग्गीचं वजन असतं ७०००० किलो.स्वयंपाकाला सुरुवात होते पहाटे साडेतीन वाजता. साडेआठच्या आत सगळे पदार्थ तयार असतात. अवघ्या चार तासांत तयार झालेलं हे अन्न मग इन्सुलेटेड वाहनांमधून हुबळीच्या जवळच्या शाळांच्या दिशेनं धावायला लागतं.ठरवून दिलेल्या वेळात एकूण ८०७ शाळांपर्यंत पोहचतं.त्या शाळांमधली १,३६,१११ मुलं रोज दुपारी अंगतपंगत करून जेवतात.