शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 06:30 IST

‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी! नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!

- भाऊसाहेब चासकर‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!त्यातून गावखेड्यातली मुले निसर्गाच्या साथीत रमणारी.त्यांना बंद वर्गखोलीत बसून शिक्षकांची भाषणे ऐकणे नकोसे होते.मन रमत नाही. मग शाळेत यावेसे वाटत नाही. शेत खुणावते.डोंगर खुणावतात. झाडे बोलावतात. न कळणारे इंग्रजी घोकण्यापेक्षामोकळ्या रानात गुरे वळायला जाणे जास्त मजेचेच असते....पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेडोपाडीची, वाडीवस्त्यांवरची मुलेशहरी कॉन्व्हेण्टवाल्यांना टक्कर देत डिजिटल जगाच्या सफरीवर निघाली आहेत. या शाळांच्या भिंती चित्रांनी सजल्या आहेत.आधीच्या ओसाड अंगणात झाडांची, पक्ष्यांची गजबज आहे.शाळेत कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर, टॅब्लेट, लॅपटॉप आणिवेब कॅमेरे आले आहेत.अनेक शाळांनी स्वत:च्या व्हर्च्युअल लॅब, डिजिटल स्टुडिओ उभारले आहेत. आॅगमेण्टेड रिअ‍ॅलिटी बुक्स वापरून खुर्द - बुद्रुकमधल्या वर्गांत पाठ्यपुस्तके जिवंत होऊ लागली आहेत.स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप अशी साधी साधने वापरूनही मुले जगाशी जोडली जात आहेत.... ही जादू कुणी केली?धडपड्या तंत्रस्नेही तरुण शिक्षकांनी !!!पदरमोड करून, मदत मागून, गावातून लोकसहभाग मिळवूनया शिक्षकांनी आपापल्या शाळांचा ‘सरकारी’ नक्षाचबदलून टाकला आहे.इटस ओके, नॉट टू बी ओके!

- आलिया भट‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे.- हल्ली मी हे लक्षात ठेवते.आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल.आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात.त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट! मग आपण काय करायचं?आपलं असं एक इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवील त्या दिशेने जायचं.जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा.सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले कीत्या निर्णयांतली सगळी गंमतनिघून जाते.

शेतात जेव्हा वीज  पिकते - समीर मराठेधुंडी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातलं तिनेकशे उंबºयांचं छोटंसं खेडं.गावात कोणाकडेच मोठी शेती नाही. कोणी श्रीमंत नाही. बहुतेकांकडे दोन-तीन एकर शेती.पण याच गावातल्या काही शेतकºयांनी एकत्र येऊन एक जगावेगळं पीक आपल्या जमिनीच्या तुकड्यांवर लावलं आहे. त्याला बियाणांची, खतांची, कीटकनाशकांची,मजुरांची कसलीच गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, पुराचा फटका बसत नाही, रोगराईनं हे पीक मरत नाही. दुष्काळही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. उलट दुष्काळ उत्तम.अंग भाजून काढणारं ऊन या पिकाला भलतं मानवतं.धुंडीच्या शेतकºयांनी लोखंडी खांब रोवून वर टांगलेल्याया अनोख्या शेतीमध्ये भारतीय शेतकºयांचं नशीब बदलण्याची जादू आहे.धुंडीतले अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?- तर वीज!सौरऊर्जा.स्वत:च्या वापरापुरती वीज सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे;पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी सहकारी तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं आणिजगातलंही पहिलं गाव आहे.

अक्षय पात्र

- सायली राजाध्यक्षकृष्णाच्या थाळीतलं अन्न कधी संपत नसे म्हणतात.मी अशाच एका स्वयंपाकघरात पोहचले होते. हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये आशिया खंडातलं हे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे. इथं रोज सकाळी १२००० ते १५००० किलो गरमागरम भात शिजतो.तब्बल २५ हजार लिटर सांबार तयार होतं. या सांबारासाठी ८००० ते ९००० किलो भाज्यांचा वापर केला जातो. ज्या दिवशी गव्हाचं पायसम किंवा हुग्गी (एक प्रकारचा शिरा) असतं,त्या दिवशी इथं शिजलेल्या साजूक तुपातल्या हुग्गीचं वजन असतं ७०००० किलो.स्वयंपाकाला सुरुवात होते पहाटे साडेतीन वाजता. साडेआठच्या आत सगळे पदार्थ तयार असतात. अवघ्या चार तासांत तयार झालेलं हे अन्न मग इन्सुलेटेड वाहनांमधून हुबळीच्या जवळच्या शाळांच्या दिशेनं धावायला लागतं.ठरवून दिलेल्या वेळात एकूण ८०७ शाळांपर्यंत पोहचतं.त्या शाळांमधली १,३६,१११ मुलं रोज दुपारी अंगतपंगत करून जेवतात.