शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आपलं नाव... आपली आकृती अन् उत्तरही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:28 IST

भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो.

ठळक मुद्दे दीपक शेटे यांचा भूमिती विषयात नवोपक्रमनव्या उपक्रमामुळे ३१.५८ टक्के यशस्वीतेचे प्रमाण वाढले.

भरत बुटालेलक्षात ठेवणे हा मानवी जीवन व्यवहारातला आवश्यक भाग आहे. त्यासाठी स्वविचार, कौशल्यातून क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यातही ओढ आणि कुतूहल वाढल्यास त्याचा अधिक फायदा होतो. हेच सूत्र भूमितीय आकृत्यांना वापरल्यानंतर त्या आकृत्यांच्या संकल्पना लक्षात ठेवण्यास मदत होतेच, शिवाय त्याची मनातली भीतीही कमी होते. हे मिणचे सावर्डे येथील आदर्श विद्यानिकेतनचे सहायक शिक्षक दीपक शेटे यांनी उपक्रमातून सिद्ध करून दाखविले.

भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो. त्यामुळे परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना अचूकता येत नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला संधी मिळत नाही आणि आपलेपणाही जाणवत नाही. याचाच अर्थ, आपण ती आकृती समजून न घेता तिला एका चौकटीपुरतेच बंदिस्त करतो. त्यामुळे त्या विषयाचे आकलन होईलच असे नाही.

गणिताच्या अध्यापनातला दीर्घ अनुभव असलेल्या दीपक शेटे यांनी यासाठी वेगळी संकल्पना तयार केली. विद्यार्थ्यांची आकृतीशी मैत्री व्हावी व त्यातून त्यांच्यात त्या संकल्पना दृढ व्हाव्यात, हा उद्देश समोर ठेवून ‘आपलं नाव, आपली आकृती आणि आपलं उत्तर’ हा उपक्रम राबविला. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढू शकते, हे सिद्ध करून दाखविले.त्यांनी हा उपक्रम प्रथम नववीच्या वर्गात राबविला. भूमिती विषयातील आकृतीस स्वत:चे, वडिलांचे व आडनाव यांतील अद्याक्षर घेऊन नाव द्यावे. चौथे अक्षर आवश्यक असल्यास गावाच्या नावातील अद्याक्षर द्यावे.

अद्याक्षर समान असल्यास त्यातील अनुक्रमे त्या नावातील दुसऱ्या किंवा तिसºया क्रमांकाचे अक्षर वापरावे, अशी पद्धत विद्यार्थ्यांना सांगून त्यांना आकृतीस नाव द्यायला सांगितले. प्रत्येकाने त्याप्रमाणे आकृत्यांना नावे दिली. त्यामुळे प्रत्येकाच्या आकृतीचे नाव वेगवेगळे आले. विशेष म्हणजे स्वत:चे नाव तिथे आल्याने त्यांना भूमितीय आकृतीत आपलेपणा जाणवला. त्यांच्यात उत्सुकता निर्माण होऊन आवडीने तो प्रमेय ते लिहू लागले. परिणामी, त्यांचे उत्तर अचूक आलेच शिवाय त्यांच्या विचारांना व वैचारिकतेला चालना मिळाल्याचे दिसले. त्यांच्यात आत्मविश्वासही वाढला. साहजिकच त्यामुळे त्यांना परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले आणि न समजता एकमेकांची उत्तरे बघून लिहिण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले. विद्यार्थ्यांना समजावून घेऊनच उत्तर लिहावे लागत असल्यामुळे आकलन क्षमतेबरोबरच अन्य विषयांच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे बळ व रुची वाढल्याचे निदर्शनास आले.उपक्रमाची यशस्वितापारंपरिक पद्धत आणि नवीन उपक्रमातील पद्धत अशा दोन प्रकारे चाचणी घेतली. पहिल्या पद्धतीत ५७.८९ टक्के विद्यार्थ्यांची योग्य उत्तरे आली. नवीन उपक्रमाचा वापर करून चाचणी घेतल्यानंतर ८१.४७ टक्के विद्यार्थ्यांची उत्तरे अचूक आली.फायदे असे...

  • विद्यार्थ्यांच्या विचारांतील
  • चालना वाढली.
  • प्रमेय समजावून घेण्यातील उत्सुकता वाढली.
  • विषयाची भीती कमी झाली.
  • कॉपीचे प्रमाण कमी झाले.
  • आकलनक्षमता व रुची वाढली.
टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण