शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

गुप्तचर यंत्रणा का अपयशी होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 13:01 IST

तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पोलिसांत दिसते. 

नेपोलियन एकदा म्हणाले होते की, युद्ध जिंकण्यासाठी हजारो सैनिक तैनात करण्याऐवजी जर एक उत्तम गुप्तचर अधिकारी असेल, तर युद्ध होण्याआधीच ते जिंकता येते. तर, अनेक शतकांपासून गुप्तचरांचे महत्त्व असे अबाधित आहे. आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रात शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, हिंदुस्थानी भाऊचा पत्ता न लागणे अशा घटनांमुळे गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा कशा काम करतात, त्यांना अपयश का येते, या प्रश्नांचा हा सारांश... 

अपयश का येते? -- तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पोलिसांत दिसते. - अशा मानसिकतेत असलेले अधिकारी मग गुप्त वार्ता संकलनासाठी आवश्यक टेहेळणी, गुप्त चौकशी, सोंग, बतावणी, शोध अशी तंत्रेच वापरत नाहीत. प्रत्यक्ष फिल्डवर जाणे, लोकांशी संवाद साधणे, स्वतःचे नेटवर्क तयार करणे, या साऱ्याला जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे दिसते. - अनेक प्रकरणांत केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून येणारी माहिती आणि राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पुढे येणारी माहिती यांच्यात तफावत दिसते. संवादाअभावी माहिती मिळण्याचे स्त्रोतच तकलादू झाल्यामुळे, मिळालेल्या माहितीची खातरजमाही करणे कठीण होते. - या साऱ्याची परिणती अपुरी, दिशाभूल करणारी माहिती मिळण्यात होते. वास्तविक या विभागाने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कान, डोळे, नाक असल्याप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. इतका महत्त्वाचा हा विभाग आहे. 

गुप्तचर यंत्रणा कसे काम करतात?जमिनीला कान लावता आले, तर जी माहिती मिळेल ती सर्व माहिती मिळविण्याचे प्रामुख्याने काम गुप्तचर यंत्रणांना करावे लागते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय आणि भोवताली घडणारी प्रत्येक घटना समजून, त्याचा अर्थ-अन्वयार्थ लावत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, याची काळजी घेणे या यंत्रणेचे सर्वात प्रमुख काम आहे. या यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना स्वतःचे माहितीचे स्त्रोत, नेटवर्क उभारावे लागते. अशा नेटवर्कमध्ये रस्त्यावरचा झाडूवाला, दूधवाला, पेपरवाला ते विशिष्ट वर्तुळात काम करणारी लोक अशा अनेकांचा समावेश असतो. भविष्यात काय होऊ शकते, याचा अंदाज बांधत काळजी घेतली जाते. मात्र, सध्या तळागाळात आवश्यक अशा नेटवर्कची कमतरता, संवादाचा अभाव प्रामुख्याने दिसून येतो. 

गुप्तचर यंत्रणांची रचना कशी आहे ? -या सेवेत जेव्हा अधिकाऱ्याचे पोस्टिंग होते, तेव्हा त्याच्या पदातून ‘पोलीस’ हा शब्द वगळला जातो. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी राज्य गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख (आयुक्त) असतो. मुख्यालयात त्या खालोखाल पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी कार्यरत असतो. तसेच चार उपायुक्त असतात. याखेरीज नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक अशा रेन्ज कार्यक्षेत्रासाठी एक उपायुक्त असतो. प्रत्येक जिल्ह्यालादेखील एक अतिरिक्त उपायुक्त अधिकारी असतो. गुप्तवार्ता विभागामध्ये व्हीआयपी सुरक्षा, नक्षल, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, राजकीय, सामाजिक, महिला अशा विविध घटकांची माहिती घेणारे उपविभाग आहेत. कानाकोपऱ्यांतून मिळणारी ही माहिती राज्य गुप्त वार्ता प्रमुखांमार्फत रोजच्या रोज मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव यांना दिली जाते.  - विशेष प्रतिनिधी 

टॅग्स :PoliceपोलिसIndiaभारतGovernmentसरकार