शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 09:54 IST

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे. 

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक 

यंदा पहिल्या हंगामात शेतकऱ्यांना टोमॅटोला किलोमागे केवळ ७ ते १० रुपये भाव मिळाला. दुसऱ्या हंगामात तर नीचांकी ५ रुपयांपर्यंत भाव होता. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांसाठी तो आतबट्ट्याचाच खेळ झाला. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. काहींनी शेतात गुरे सोडून दिले, त्याची छायाचित्रेही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली. मात्र शहरातील लोकांचे त्याकडे फारसे लक्ष गेले नाही. तोट्यात विकण्यापेक्षा नंतर अनेक शेतकऱ्यांनी प्लॉट तसेच सोडून दिले. मग काय, उत्पादन घसरले. त्यातच उशिराचा पाऊस, बदलते हवामान, वाढलेले तापमान याचाही देशभरातील उत्पादनाला फटका बसला आणि आता आठ-पंधरा दिवसांपासून भाव वाढले आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून ८० रुपये किलोने घेतलेला टोमॅटो आपल्या घरापर्यंत येईपर्यंत मध्यस्थांच्या साखळीमुळे १५० ते २०० रुपये किलो होतात. मध्यस्थांची नफेखोरी महागाईला आमंत्रण देते. 

उत्पादन खर्च किती? एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. बाजार समितीत नेईपर्यंत हा खर्च १६ ते १७ रुपयांवर जातो. एकरी साधारण एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो. उत्पादन कमी झाले तर खर्च वाढतो. 

शेतकऱ्यांना मोठा फटका शेतकऱ्यांनी यावर्षी मार्च महिन्यात सरासरी भाव ५-१० रुपये, एप्रिलमध्ये ५-१५ रुपये आणि मे महिन्यात तर केवळ २.५० ते ५ रुपये किलो दराने टोमॅटो विकले. त्यामुळे शेतकऱ्यांना किती फटका बसला असेल, याची कल्पना येते.  

मी दोन एकरावर टोमॅटो लागवड केली होती. मात्र मे व जूनच्या सुरुवातीला मला किलोमागे केवळ २ ते ४ रुपये भाव मिळाला. बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होईना. त्यामुळे तो प्लॉट मी तसाच सोडून दिला. टोमॅटोचा शेतातच चिखल झाला. माझा दोन लाखांचा खर्च वाया गेला.  - अमृत कापडणीस, टोमॅटो उत्पादक, सटाणा, नाशिक

कसे आहे गणित? राज्यात सातारा, जुन्नर आणि नाशिकमध्ये टोमॅटोचे चांगले उत्पादन होते. औरंगाबाद पट्ट्यातही आता टोमॅटो पीक घेतले जाते.  सातारा, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत बाजारात टोमॅटो येतो. त्यानंतर नाशिकपासून इतर ठिकाणी आवक वाढते. राज्यनिहाय टोमॅटोच्या उत्पादनाचा कालावधी भिन्न आहे. टोमॅटो काढणीचा काळ डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात टोमॅटोचे उत्पादन कमी असते.  

 

 

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी