शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

भटकंतीच्या छंदाने ‘स्वप्न’ जगायला शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:33 IST

भटकंती करीत आनंद लुटण्यासोबतच विविध भागांतील संस्कृतीचा अभ्यास करीत आणि वाटेत भेटतील त्या सर्वांशी संवाद साधत धावत सुटलेल्या भूषण पाटीलने नुकतेच कच्छचे रण पालथे घातले. ३२०० किलोमीटरचा हा थरारक व तेवढाच आनंददायी आणि ज्ञानाची मोठी शिदोरी पदरी पाडणारा प्रवास त्याने १० दिवसांत पूर्ण केला.  

- दीपक देशमुख

भूषण पाटील हा मराठवाड्यातील लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी. भटकंती करीत विविध भागांना भेटी देण्याचा त्याचा आवडता प्रांत. नवनवीन लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्याचे वेड त्याला आजपर्यंत विविध भागांत घेऊन गेले. 

या प्रवासात त्याने चारचाकी वाहनापेक्षा दुचाकीला अधिक महत्त्व दिले. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला, जग अधिक जवळून पाहता यावे, लोकांशी अधिक जवळीक साधता यावी, याचसोबत खडतर आणि अवघड वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी आवडीची ‘इनफिल्ड थंडरबर्ड’ अर्थात माझी ‘शेरदिल’ निवडली. 

दुचाकीवरून सहलीला खरेतर ‘विकएण्ड’मधून सुरुवात झाली. जवळची पर्यटन स्थळे पालथी घालायला सुरुवात झाली. पुढे लांबच्या प्रवासाचे बेत आखले. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नुकतीच पार पडलेली ‘कच्छ’ सवारी! भूषण सांगत होता, पालकांची परवानगी मिळायला फारसा वेळ लागला नाही. कारण ते मला नेहमीच प्रोत्साहन देत माझ्या पाठीशी उभे राहिले. लगेच तयारीला लागलो. आवश्यक ती तयारी झाली आणि ११ जानेवारी २०१९ रोजी पहाटे ५ वाजता औरंगाबादहून मोहिमेवर निघालो. कच्छचे रण साद घालत होते. प्रवास सुरू झाला. 

लहान-मोठी गावे मागे टाकत गुजरातमध्ये प्रवेश केला. प्रथम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ हे स्मारक गाठले. सारी भव्यदिव्यता डोळ्यात साठवली. धन्य वाटले. त्यानंतर वडोदरामार्गे अहमदाबादला पोहोचलो. साबरमती आणि कांकरिया सरोवर मन भरून पाहिले. गुजरातेतील विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत भुजच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. 

नजर पोहोचेल तिथवर रूपेरी, चंदेरी जमीन आणि पांढरे-नळे आकाश बघून त्या मोहक वातावरणात हरवून गेलो. मन आणि विचार ताजेतवाने झाले. त्यानंतर भूजवरून सौराष्ट्रा शिरलो. काठीयावाडी भोजन आणि मोठ्या मनाची माणसे यामुळेच या भागातील पर्यटन अधिक फुलले असावे. द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गीर अभयारण्य ही ठिकाणे डोळ्याचे पारणे फेडतात, याचा अनुभव घेतला. परतीच्या प्रावासात जुनागढजवळ एका संकटात सापडलो; पण स्थानिक लोक मदतीला धावून आल्याचे सांगताना तो म्हणाला, ‘जगात चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग सुंदर बनले आहे. माणुसकी जिवंत आहे, सांस्कृतिक वारसा जिवापाड जपला जातो आहे, याचा प्रत्यय पावलोपावली आला. या प्रवासाने ‘स्वप्न’ जगायला शिकविले.’  

‘अकेला गया था मै, ना आया अकेलामेरे संग संग आया यादों का मेला....’

म्हणत भूषण पाटील सांगत होता, या प्रवासातून मोलाचे अनुभव आले. खूप शिकायला मिळाले. प्रवासात मदत करणारी माणसे भेटली. कधी ऐकटेपणा जाणवलाच नाही. राजकोट, वडोदरा, सुरत असा प्रवास करीत १० व्या दिवशी दुपारी ३.३० वाजता तो ३२२५ किमी भटकंती करून औरंगाबादेत पोहोचला. 

टॅग्स :tourismपर्यटनhighwayमहामार्गbikeबाईक