शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

ताजमहाल! ऐतिहासिक वारशाचा तिरस्कार हादेखील धर्मद्वेषच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 11:09 IST

- सुरेश द्वादशीवारउत्तर प्रदेशच्या आदित्यनाथांच्या द्वेषाचे राजकारण आता थेट ताजमहाल या जगातल्या आठव्या आश्चर्यापर्यंत पोहचले आहे. देशातील सर्वाधिक प्रेक्षणीय वास्तू व जगभरच्या पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या ताजमहाल या आगऱ्यातील मानवी चमत्काराला या मुख्यमंत्र्याने राज्याच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळले आहे. ताजमहालचे सौंदर्य, माहात्म्य व ऐतिहासिक वारसा या गोष्टी कुणालाही नाकारता येणाऱ्या नाहीत. ...

- सुरेश द्वादशीवार

उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथांच्या द्वेषाचे राजकारण आता थेट ताजमहाल या जगातल्या आठव्या आश्चर्यापर्यंत पोहचले आहे. देशातील सर्वाधिक प्रेक्षणीय वास्तू व जगभरच्या पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या ताजमहाल या आगऱ्यातील मानवी चमत्काराला या मुख्यमंत्र्याने राज्याच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळले आहे. ताजमहालचे सौंदर्य, माहात्म्य व ऐतिहासिक वारसा या गोष्टी कुणालाही नाकारता येणाऱ्या नाहीत. पण ताजमहाल ही शाहजहान या मुसलमान बादशहाने मुमताज महल या आपल्या आवडत्या बेगमसाठी बांधलेली कबर आहे आणि तो इस्लामचा वारसा आहे असे या कर्मठ हिंदुत्ववाद्याला वाटत आहे. वास्तविक बाबरापासून जफरपर्यंतचा इतिहास हा केवळ इस्लामी सत्तेचा नाही, तो भारताचा इतिहास आहे. ताजमहाल ही त्याची वर्तमानाला लाभलेली देण आहे. केवळ संकुचित माणसेच तिच्या सौंदर्यावर व ऐतिहासिक थोरवीवर धार्मिक शिक्का उमटवू शकतात.

ताजमहाल ही देशाची सांस्कृतिक संपत्ती आणि जगभरच्या प्रेमीजनांचे विसाव्याचे स्थान आहे. भारत हा केवळ योग्यांचा, संन्याशांचा, साध्व्यांचा, बाबा आणि बुवांचा देश नाही; तो सामान्य व चांगल्या नागरिकांचाही देश आहे. हा नागरिक धर्मांध नाही आणि त्याला ताजमहाल ही इस्लामची नसून इतिहासाची देणगी वाटत आली आहे. या देशातील कवी व कलावंतांच्या प्रतिभेला व कर्तबगारीला त्या वास्तूने फुलविले आणि जागविले आहे. तिने साहित्य आणि कलेचा प्रांत समृद्ध केला आहे. जगभरातील वास्तू व शिल्पशास्त्र्यांना तिचे माहात्म्य व कौतुक वाटले आहे. झालेच तर भारतात येणारे सर्वाधिक पर्यटक ताजमहालला भेट देणारे आहेत. या पर्यटकांना मंदिरे दाखविली पाहिजेत, गंगा दाखविली पाहिजे, काशी विश्वेश्वराचे मंदिरही (ते जरा स्वच्छ करून) दाखविले पाहिजे. मात्र त्याचबरोबर लाल किल्ला, फत्तेपूर शिक्री, अजमेरच्या ख्वाजाचे स्थान आणि ताजमहालही दाखविता आलेच पाहिजे. भारत ही पाच हजार वर्षांची परंपरा आहे. आर्य, शक, हूण, मुसलमान व ख्रिश्चन या साऱ्यांना कवेत घेऊन येथील राष्ट्रीय प्रवाहांनी ती समृद्ध व सुंदर करीत आणली आहे. तिचे धर्मवार तुकडे पाडण्याचा आदित्यनाथ या पुढाऱ्याला, त्याच्या पक्षाला व परिवाराला हक्क नाही. पूर्वी एकदा पी. एन. ओक या नावाच्या एका बेगडी इतिहास संशोधकाने ताजमहाल हा तेजोमहाल असल्याचे व ते हिंदूंचे पूजास्थान असल्याचे सांगून एक विनोद घडविला होता. त्याच काळात प्रशिया (जर्मनी) आणि ऑस्ट्रिया या देशांची मूळ नावे पुरुषीय व स्त्रिया अशी होती असा जावईशोधही त्याने लावला होता. (त्याचे ते बेगडी शोध अनेक अर्धवटांना आनंदी करणारेही तेव्हा ठरले होते.) त्यावर कोटी करताना पु.ल. म्हणाले, त्याचमुळे कदाचित त्या दोन देशांच्या खाली असलेल्या छोट्या देशांना ‘बालकन्’ हे नाव पडले असावे. पुढे जाऊन त्या प्रचारी इतिहासकाराच्या नावाची चिरफाड ‘पी अन् ओक’ अशीही त्यांनी केली होती. या ओकांसारखी माणसे आणि त्यांचे उथळ लिखाण ज्यांना भावते त्यांच्या बुद्धीचा व आकलनाचा आपण राग धरता कामा नये. समज आणि आवड

हेच ज्ञान असे समजणाऱ्यांकडून जास्तीच्या अध्ययनाची व आकलनाची अपेक्षाही करायची नसते.

आदित्यनाथांचे ताजमहालला पर्यटनस्थळातून काढण्याचे कृत्य केंद्र सरकारला जसे आवडले नाही तसे त्यांच्या मंत्रिमंडळातील इतरांनाही ते आवडले नाही. रिटा बहुगुणा या त्यांच्या पर्यटनमंत्र्याने ताजमहाल भोवतीच्या पर्यटकांच्या सोयी वाढवण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे याच वेळी जाहीर झाले आहे. आदित्यनाथांचे भांडण ताजमहालशी नाही; ते अल्पसंख्य मुसलमानांशी आहे. ते कर्मठ आहेत, एका धार्मिक आश्रमाचे प्रमुख आहेत आणि टोकाचे परधर्मद्वेष्टे आहेत. ज्या वास्तूवर जग प्रेम करते त्या वास्तूवरचा त्यांचा द्वेष त्यातून आला आहे. प्रेम आणि राग किंवा आत्मीयता आणि तिरस्कार हे मनाचे गुण आणि व्यक्तीचे अधिकार आहेत. प्रत्येकाला आपल्या प्रेमाचा व द्वेषाचा विषय निवडून घेण्याचा अधिकारही आहे. मात्र या अधिकाराला इतर साºया अधिकारांप्रमाणे व्यक्तिगत आवडीनिवडीची मर्यादा आहे. आदित्यनाथांना ताजमहाल आवडत नसेल तर तो त्यांच्या अधिकाराचा भाग आहे; मात्र आपली आवड वा नावड साऱ्या समाजावर, राज्यावर वा देशावर लादणे हा एका हुकूमशाही मानसिकतेचा प्रकार आहे. स्वधर्मावर प्रेम करणे ही बाब स्वाभाविक म्हणावी अशी आहे आणि ते करण्याचा हक्क घटनेनेही साऱ्यांना दिला आहे. मात्र द्वेष आणि तिरस्कार या गोष्टी जेवढ्या अस्वाभाविक तेवढ्याच त्या नागरी स्वातंत्र्याच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. त्यातून एखाद्या धर्मविशेषाचा आणि त्यातील ऐतिहासिक थोरामोठ्यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंचा द्वेष हा साऱ्या इतिहासाएवढाच देशाचाही अपमान करणारा प्रकार आहे आणि असा अपमान मुख्यमंत्री म्हणविणाऱ्या इसमालाही क्षम्य ठरणारा नाही. मात्र द्वेष हेच ज्यांच्या राजकारणाचे अधिष्ठान आहे त्यांना हे सांगण्यात फारसे हशील नाही.

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)