शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली शैक्षणिक चळवळ... एकलव्य अकॅडमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:37 IST

देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडीफार चांगली विद्यापीठे वा संस्था आहे, तिथे शहरी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांचा टक्का जास्त आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी संख्या अजून वंचित आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा म्हणावी तेवढी रूजली नाही.

  • प्रा. राजू केंद्रे

विदर्भमराठवाड्यातील पोरं बारावी झाल्याबरोबर पोलीस भरती, रेल्वे भरती, कर्मचारी चयन आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर सरकारी खात्याच्या भरती परीक्षेच्या तयारीसाठी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी, नागपूर आणि पुणेसारख्या ठिकाणी धाव घेतात. दरवर्षी अशा लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांची भर पडत आहे. त्यांचे पुढचे शिक्षण स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीवर्गातून घडते. विद्यापीठांची जागा अशा खासगी शिकवणी सस्थांनी घेतल्याचे चित्र आज महाराष्ट्रभर दिसत आहे.

शासकीय नोकरीतील संधी कमी असल्यामुळे तीन वर्षे, पाच वर्षे आणि दहा वर्षे परीक्षांच्या तयारीसाठी घालवूनही हाती यश लागण्याची शक्यता अत्यंत कमीच. असे असूनही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण, कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव, पालकांच्या अपेक्षा, पर्यांयांबाबतची अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी स्पर्धेच्या दुष्टचक्रात फसलेले आहेत. आयुष्यातील महत्वाची वर्षे घालवूनही यश न आल्याने असे तरुण आत्मविश्वास हरवून शेवटी हताश होऊन बसतात. अशा तरुणांना उच्च शिक्षणाची वाट दाखवून समाज विकास क्षेत्रात करियरच्या पर्यायी संधी मिळवण्यासाठी एकलव्य हे तरुणांचे व्यासपीठ बनले आहे. ग्रामीण तरुणांची गरज लक्षात घेऊन ‘एकलव्य’ने विविध उपक्रम सुरू केलेले आहेत.विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या या चळवळीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्यशाळा व संसाधने उपलब्ध केली जातात. यामध्ये विदर्भ (यवतमाळ), मराठवाड्यातल्या (बीड) अविकसित जिल्ह्यांमध्ये एकलव्यमार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, जे.एन.यू. आदीसारख्या अनेक नावाजलेल्या भारतीय, आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत सोबतच प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती पुरविण्यात आली. इथेच न थांबता एकलव्यमार्फत २५ नोव्हेंबर २०१९ ते ०५ जानेवारी २०२० दरम्यान ४० दिवसाचा निवासी वर्ग यवतमाळ येथे चालविण्यात आला. त्यात वरील शिक्षण संस्थांच्या पूर्वपरीक्षेची तयारी करून घेण्यात आली.या वर्गामध्ये यवतमाळ, बीड, औरंगाबाद, बुलडाणा व अमरावतीसारख्या भागातून ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कौतुकाची बाब अशी की, नि:शुल्क असलेल्या या वर्गातून ४३ विद्यार्थी नुकत्याच झालेल्या २०२० च्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या तयारीकरिता यवतमाळ येथे ३ दिवसीय निवासी शिबिर २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले.३० हजार पुस्तकांची देवाण-घेवाणग्रामीण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, वाचन संस्कृती जोपासली जावी व गावागावातील ग्रंथालये ही केवळ वाचनकेंद्र न राहता गावाची शाश्वत विकासकेंद्र असावीत या उद्देशाने टीम एकलव्यने ‘गाव तिथे ग्रंथालय’ हा उपक्रम हाती घेतला. पुणेसारख्या शहरांतून आजवर या तरुणांमार्फत घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून ३० हजारांहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील ३० हून अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत. मागील दोन वर्षांपासून लोकांनी या उपक्रमास भरभरून मदत केली.

टॅग्स :Educationशिक्षणVidarbhaविदर्भ