शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:30 IST

कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं.

ठळक मुद्देतिला समजायला लागलं तेव्हापासून ते आजपर्यंत सायमा फक्त आपल्या मनातलं गोठलेलं कागदावर उतरवत आली आहे.स्वत:चे, स्वत:पुरते का होईना पण शाश्वत सत्य आपल्या कवितेतून ती उलगडत आली आहे.हळुवार आणि अलगदपणे लिहिणारी सायमा तिच्या कवितांतून सामाजिक भानही जपते आहे.

>> संकेत म्हात्रे

मी नावं लिहिली आपल्या दोघांचीज्याची अक्षरं अगदी घट्ट निरंतरएकमेकांच्या मिठीत असतातहा महासागर स्वच्छ करतो आपल्या नावातल्या कोपऱ्यांनाहीआणि हळूच कुर्वाळतो आपल्या शब्दांतल्या मखमालात विसावणाऱ्या असीम अरण्यांनालाटा नतमस्तक होतात, शब्दांना धरतात आपल्या माथ्यांवर, पुन्हा परततातलाटा पुन्हा वर येतात, पुन्हा नाव गिरवतात आपलं इतिहासातल्या हरवलेल्या खजिन्यांवर.आपण चकाकतो पाण्यावर तरंगणाऱ्याचांदण्यांखाली ज्या आजन्म वाट पाहतात,त्या लैलाची जिने आपल्या मजनूचंपहिलंवहिलं नाव परत करावं...

आता आपण जरा वीसेक वर्षे पाठी जाऊ या. कोलकाता येथे एका १५ वर्षांच्या मुलीला प्रचंड राग आला. ( याचं कारण आपल्याला माहीत नाही, पण त्याने तसा फारसा फरक पडत नाही). ती आदळआपट करू लागली, उशीला रागाने मारू लागली. मग, त्या मुलीने कुठेतरी पेपरात वाचलं की, लिहिण्याने मनातला राग कागदावर उतरवता येतो आणि संपवताही येतो. म्हणून ती लिहू लागली. वाट्टेल ते, वाट्टेल तसं. आपण जे काही लिहिलंय, ते या मुलीनं एका वर्तमानपत्रात आपल्या पद्धतीने पाठवलं आणि पुढच्या आठवड्यात तिनं खरडलेलं काहीतरी कविता या नावाखाली छापून आलं. ती होती, हैदराबादमधल्या सायमा आफ्रिन नावाच्या कवयित्रीची कवितेतली सुरुवात.

ती कोलकात्यात राहत असली, तरीही तिचा जन्म गाया या छोट्याशा शहरातला आहे. हे तेच शहर जिथे गौतम बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झालं. कदाचित, या परिसराचा- जुन्या पिंपळाच्या झाडाचा, गावातल्या वडिलोपार्जित घराचा, पालखीतून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचा, घरातल्या रंगीत काचांवर पडणाऱ्या उजेडाचा, त्यातून उधळणाऱ्या कैक रंगांचा, लहान-थोरल्यांच्या कथांचा आणि कुठेतरी बंद डोळ्यांमागच्या सचैल शांतीचा या कवयित्रीवर प्रभाव असलेला जाणवतो. कारण, एका वर्तमानपत्रात काम करणारी सायमा, दुसरीकडे इतकं हळुवार आणि अलगद पण अस्वस्थ करणारं लिहिते,

ही कदाचित गायामधल्या त्या बुद्धाची महती असावी.

पुढे कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं. सायमाचे आईबाबा बऱ्याचदा उर्दू आणि फारसी दोह्यांमधून एकमेकांशी संवाद साधत, पण कदाचित यामुळेच सायमावर कवितेचा आणि भाषेचा फार मोठा प्रभाव पडत राहिला. ही कवयित्री शब्दांच्या अधिक जवळ जाऊ लागली. गाया, कोलकाता, कामासाठी हैदराबाद आणि मग कवितेच्या शिष्यवृत्तींमुळे सायमा जग हिंडू लागली किंवा आपल्यात वैश्विक कवितेची मुळात जाणीव असल्यामुळे जगातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांतून तिला निमंत्रणं मिळू लागली. पण, खरी गंमत मला तिच्या कवितेच्या आशयाबाबत वाटते. सूक्ष्मतेचा धागा सायमा अगदी सहज पकडते आणि त्याच्या विळख्यात वाचकाला गुरफटून टाकते. कदाचित, यालाच काव्यानुभूती म्हणत असावेत.

तू, तू होण्याआधी, होतास पाणी, हवा,जंगल, फूल आणि एक सरोवरएका परित्यक्त घरातला ज्याचे खांदे हवेच्या झुळुकेने इतक्या वेळा घासलेकी शेवटी त्यात निर्माण झाला एक छिद्र.आत : हलका उजेड. त्यानंतर, फक्त अंधार.शेवटी अंधारामुळेच तुला कळतेउजेडाची चव जसे कळते रक्तएका सिंहाला जो पाठलाग करतो त्या रक्ताचा,काळोखात, स्वत: काळोखासारखा होईपर्यंत.उजेडाची भूक पसरते जंगलाच्या भूमीवर,गडद हिरव्या नेचांवर,त्यांची पानं ज्वलनांच्या रेखाकृतींसारखी,ज्वालांमध्येच मिसळलेली.काल, हे तलाव पसरलं या अशुपालाच्या रस्त्यांवरजे चालले होते सूर्याकडे.त्या आभाळाने चव घेतली त्या तळ्याचीआणि बाहेर थुंकलं अंधाराला, म्हणजे तुला.

सायमाची कविता ही काळानुसार बदलत गेली आणि त्यात निरनिराळे विषय, आशयघनता आणि अनुभव झळकू लागले. एकीकडे आपल्याला सामाजिक भान येतंय याची चाहूल लागते आणि दुसरीकडे आपला स्वतंत्र आवाज आहे हे सुद्धा जाणवायला लागतं. म्हणजे सुरुवातीला सायमा किट्स किंवा शेलेसारखं लिहू पाहायची. पण पुढेपुढे तिला एक वेगळा सखोल आवाज सापडला आणि तो सुद्धा फार विलक्षण होता. पुढे ती निरनिराळ्या भाषांत कविता वाचू लागली, अभ्यासू लागली, त्यामुळे विविध भाषांत एकच गोष्ट किती वैविध्यपूर्ण मांडली जाते, हे सुद्धा तिला कळू लागलं. कदाचित, कवितेच्या या नव्या वळणावर तिला पाब्लोसारख्याही एका कवीने मोहून टाकलं असावं...

नेरुदाची गाणी भरतातआपल्या गुडघ्यात शंखातल्या लाटामृत्युमुखी पडतात जेव्हा चिरडल्या जातातहोरपळलेल्या ट्रेनमधून उतरणाऱ्या बुटांखाली

सायमाची कविता लिहिण्याची प्रक्रिया फार सुरेख आणि नैसर्गिकतेकडे झुकणारी आहे. ती कधीही कविता ठरवून लिहीत नाही. याउलट, तिचं मंथन चालूच असतं. ती कवितेला तिच्या अंतर्मनात झिरपू देते आणि मग कागदावर उतरवते. कविता लिहीत नसली, तरीही सायमाचा कवितेचा अभ्यास निरंतर चालू असतो. सामाजिकतेचं भान ती फार स्पष्टपणे मांडते. काश्मीर हा विषय तिच्या कवितेत डोकावतो, तसंच जसं नेरुदा, तिचे बाबा किंवा कविता, शब्द पुन:पुन्हा तिच्या ओळींमध्ये आढळतात. काश्मीरमधल्या मुलासाठी सायमा असं लिहिते -

रे मुला बघ एक छोटी कागदाची होडी हलतेयतांबड्या पाण्यावरजिथे कत्तल झाली आहे बालगीतांचीजिथे तुझ्या आईने एकेकाळी ठेवला होतातुझ्या स्वप्नांचा एक अश्रूआणि एक काजवा, तिच्या चेहऱ्यावरचारे मुला मला सांगया जगाला कधी कळू शकेल कामर्त्य गर्भात श्वास घेणं किती कठीण असतं ते!

इतकं नाजूक आणि आतलं लिहिणारी सायमा इतकं जीवघेणंही लिहू शकते, यावर विश्वास बसत नाही. पण, माझ्या मते, ज्यांच्या शब्दांना वेदनेचं मूळ कळलं असतं, त्या नेमक्या अर्थाशी आणि अनुभवाशी पोहोचू शकतात. हीच कवितेची किमया!

(संकलन : स्नेहा पावसकर)

टॅग्स :literatureसाहित्य