शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:30 IST

कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं.

ठळक मुद्देतिला समजायला लागलं तेव्हापासून ते आजपर्यंत सायमा फक्त आपल्या मनातलं गोठलेलं कागदावर उतरवत आली आहे.स्वत:चे, स्वत:पुरते का होईना पण शाश्वत सत्य आपल्या कवितेतून ती उलगडत आली आहे.हळुवार आणि अलगदपणे लिहिणारी सायमा तिच्या कवितांतून सामाजिक भानही जपते आहे.

>> संकेत म्हात्रे

मी नावं लिहिली आपल्या दोघांचीज्याची अक्षरं अगदी घट्ट निरंतरएकमेकांच्या मिठीत असतातहा महासागर स्वच्छ करतो आपल्या नावातल्या कोपऱ्यांनाहीआणि हळूच कुर्वाळतो आपल्या शब्दांतल्या मखमालात विसावणाऱ्या असीम अरण्यांनालाटा नतमस्तक होतात, शब्दांना धरतात आपल्या माथ्यांवर, पुन्हा परततातलाटा पुन्हा वर येतात, पुन्हा नाव गिरवतात आपलं इतिहासातल्या हरवलेल्या खजिन्यांवर.आपण चकाकतो पाण्यावर तरंगणाऱ्याचांदण्यांखाली ज्या आजन्म वाट पाहतात,त्या लैलाची जिने आपल्या मजनूचंपहिलंवहिलं नाव परत करावं...

आता आपण जरा वीसेक वर्षे पाठी जाऊ या. कोलकाता येथे एका १५ वर्षांच्या मुलीला प्रचंड राग आला. ( याचं कारण आपल्याला माहीत नाही, पण त्याने तसा फारसा फरक पडत नाही). ती आदळआपट करू लागली, उशीला रागाने मारू लागली. मग, त्या मुलीने कुठेतरी पेपरात वाचलं की, लिहिण्याने मनातला राग कागदावर उतरवता येतो आणि संपवताही येतो. म्हणून ती लिहू लागली. वाट्टेल ते, वाट्टेल तसं. आपण जे काही लिहिलंय, ते या मुलीनं एका वर्तमानपत्रात आपल्या पद्धतीने पाठवलं आणि पुढच्या आठवड्यात तिनं खरडलेलं काहीतरी कविता या नावाखाली छापून आलं. ती होती, हैदराबादमधल्या सायमा आफ्रिन नावाच्या कवयित्रीची कवितेतली सुरुवात.

ती कोलकात्यात राहत असली, तरीही तिचा जन्म गाया या छोट्याशा शहरातला आहे. हे तेच शहर जिथे गौतम बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झालं. कदाचित, या परिसराचा- जुन्या पिंपळाच्या झाडाचा, गावातल्या वडिलोपार्जित घराचा, पालखीतून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचा, घरातल्या रंगीत काचांवर पडणाऱ्या उजेडाचा, त्यातून उधळणाऱ्या कैक रंगांचा, लहान-थोरल्यांच्या कथांचा आणि कुठेतरी बंद डोळ्यांमागच्या सचैल शांतीचा या कवयित्रीवर प्रभाव असलेला जाणवतो. कारण, एका वर्तमानपत्रात काम करणारी सायमा, दुसरीकडे इतकं हळुवार आणि अलगद पण अस्वस्थ करणारं लिहिते,

ही कदाचित गायामधल्या त्या बुद्धाची महती असावी.

पुढे कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं. सायमाचे आईबाबा बऱ्याचदा उर्दू आणि फारसी दोह्यांमधून एकमेकांशी संवाद साधत, पण कदाचित यामुळेच सायमावर कवितेचा आणि भाषेचा फार मोठा प्रभाव पडत राहिला. ही कवयित्री शब्दांच्या अधिक जवळ जाऊ लागली. गाया, कोलकाता, कामासाठी हैदराबाद आणि मग कवितेच्या शिष्यवृत्तींमुळे सायमा जग हिंडू लागली किंवा आपल्यात वैश्विक कवितेची मुळात जाणीव असल्यामुळे जगातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांतून तिला निमंत्रणं मिळू लागली. पण, खरी गंमत मला तिच्या कवितेच्या आशयाबाबत वाटते. सूक्ष्मतेचा धागा सायमा अगदी सहज पकडते आणि त्याच्या विळख्यात वाचकाला गुरफटून टाकते. कदाचित, यालाच काव्यानुभूती म्हणत असावेत.

तू, तू होण्याआधी, होतास पाणी, हवा,जंगल, फूल आणि एक सरोवरएका परित्यक्त घरातला ज्याचे खांदे हवेच्या झुळुकेने इतक्या वेळा घासलेकी शेवटी त्यात निर्माण झाला एक छिद्र.आत : हलका उजेड. त्यानंतर, फक्त अंधार.शेवटी अंधारामुळेच तुला कळतेउजेडाची चव जसे कळते रक्तएका सिंहाला जो पाठलाग करतो त्या रक्ताचा,काळोखात, स्वत: काळोखासारखा होईपर्यंत.उजेडाची भूक पसरते जंगलाच्या भूमीवर,गडद हिरव्या नेचांवर,त्यांची पानं ज्वलनांच्या रेखाकृतींसारखी,ज्वालांमध्येच मिसळलेली.काल, हे तलाव पसरलं या अशुपालाच्या रस्त्यांवरजे चालले होते सूर्याकडे.त्या आभाळाने चव घेतली त्या तळ्याचीआणि बाहेर थुंकलं अंधाराला, म्हणजे तुला.

सायमाची कविता ही काळानुसार बदलत गेली आणि त्यात निरनिराळे विषय, आशयघनता आणि अनुभव झळकू लागले. एकीकडे आपल्याला सामाजिक भान येतंय याची चाहूल लागते आणि दुसरीकडे आपला स्वतंत्र आवाज आहे हे सुद्धा जाणवायला लागतं. म्हणजे सुरुवातीला सायमा किट्स किंवा शेलेसारखं लिहू पाहायची. पण पुढेपुढे तिला एक वेगळा सखोल आवाज सापडला आणि तो सुद्धा फार विलक्षण होता. पुढे ती निरनिराळ्या भाषांत कविता वाचू लागली, अभ्यासू लागली, त्यामुळे विविध भाषांत एकच गोष्ट किती वैविध्यपूर्ण मांडली जाते, हे सुद्धा तिला कळू लागलं. कदाचित, कवितेच्या या नव्या वळणावर तिला पाब्लोसारख्याही एका कवीने मोहून टाकलं असावं...

नेरुदाची गाणी भरतातआपल्या गुडघ्यात शंखातल्या लाटामृत्युमुखी पडतात जेव्हा चिरडल्या जातातहोरपळलेल्या ट्रेनमधून उतरणाऱ्या बुटांखाली

सायमाची कविता लिहिण्याची प्रक्रिया फार सुरेख आणि नैसर्गिकतेकडे झुकणारी आहे. ती कधीही कविता ठरवून लिहीत नाही. याउलट, तिचं मंथन चालूच असतं. ती कवितेला तिच्या अंतर्मनात झिरपू देते आणि मग कागदावर उतरवते. कविता लिहीत नसली, तरीही सायमाचा कवितेचा अभ्यास निरंतर चालू असतो. सामाजिकतेचं भान ती फार स्पष्टपणे मांडते. काश्मीर हा विषय तिच्या कवितेत डोकावतो, तसंच जसं नेरुदा, तिचे बाबा किंवा कविता, शब्द पुन:पुन्हा तिच्या ओळींमध्ये आढळतात. काश्मीरमधल्या मुलासाठी सायमा असं लिहिते -

रे मुला बघ एक छोटी कागदाची होडी हलतेयतांबड्या पाण्यावरजिथे कत्तल झाली आहे बालगीतांचीजिथे तुझ्या आईने एकेकाळी ठेवला होतातुझ्या स्वप्नांचा एक अश्रूआणि एक काजवा, तिच्या चेहऱ्यावरचारे मुला मला सांगया जगाला कधी कळू शकेल कामर्त्य गर्भात श्वास घेणं किती कठीण असतं ते!

इतकं नाजूक आणि आतलं लिहिणारी सायमा इतकं जीवघेणंही लिहू शकते, यावर विश्वास बसत नाही. पण, माझ्या मते, ज्यांच्या शब्दांना वेदनेचं मूळ कळलं असतं, त्या नेमक्या अर्थाशी आणि अनुभवाशी पोहोचू शकतात. हीच कवितेची किमया!

(संकलन : स्नेहा पावसकर)

टॅग्स :literatureसाहित्य