शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 07:00 IST

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं!

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं! हल्ली लग्नसमारंभात लग्नात आलेल्या पाहुण्यांचे माईकवरून नाव घेऊन स्वागत करण्याची अतिशय चुकीची पद्धत सुरू झाली आहे. पूर्वी हे ग्रामीण भागात होत असे,पण ते लोण आता शहरातही आले आहे.हा प्रकार थांबवलाच पाहिजे...- अंकुश काकडे- 

खरं म्हटलं तर विवाहासारख्या समारंभांना आपण ज्यांना निमंत्रण देतो ते सर्वच जण प्रतिष्ठित असतात. असे असताना काही ठराविक लोकांचीच नावे घेऊन स्वागत केले जाते हे कितपत योग्य आहे? पण याचा कुणी विचारच करीत नाही. शिवाय ज्यांची नावे पुकारली जातात त्यातील किती जण प्रतिष्ठित असतात हादेखील प्रश्न उपस्थित होतो. ‘लग्नात आमची नावे पुकारू नका, आमचे हारतुरे, शाल-फेटे, श्रीफळ देऊन स्वागत करू नका, फक्त वेळेत लग्न लावा,’ असे आवाहन करणारे पत्रक (कै.) मोहन धारिया, विठ्ठल तुपे, बाबासाहेब पुरंदरे, खा. गिरीश बापट, विनायक निम्हण, शशिकांत सुतार, उल्हास पवार, तत्कालीन महापौर कमल व्यवहारे, डॉ. एस.बी. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड यांच्याशिवाय अनेक आमदार, नगरसेवकांनी आवाहन केले होते. यासाठी मीच पुढाकार घेतला होता. पुढे आठवडाभर त्याचा थोडा परिणाम दिसला, पण परत हार-तुरे देणे-स्वीकारणे सुरू झाले, पण त्याला शशिकांत सुतार, उल्हास पवार आणि मी, मात्र आजपर्यंत ठाम राहिलो आहोत. कितीही वेळा नाव पुकारले तरी आम्ही स्टेजवर जात नाही. वेळेत लग्न लागलं तर नशीब, लग्न हे मुहूर्तावर लावलं जावं, याला काही शास्त्रीय-धार्मिक आधार आहे. पण त्याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जाते. शिवाय या प्रतिष्ठित पाहुण्यांना आपण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावतो हे विसरून त्यांच्या हस्ते जावईमान देण्याचा कार्यक्रम, काही लग्नात असे डझनभर जावई असतात, एक तर ते वेळेवर येत नाहीत, काही जावई तर वराच्या मिरवणुकीत नाचत असतात, तोपर्यंत तो प्रतिष्ठित पाहुणा स्टेजवरच. ज्यांनी हा विवाह जमवला त्याचा सत्कार, जणू काही त्याने उपकारच केलेत.नवरदेव वेळेत येत नाही, आला तर वधूचा पत्ता नाही, एकतर ती पार्लरमध्ये गेलेली असते, तेथे तिला उशीर होतो, परत उशीर झाल्याचं उत्तर ठरलेलं, ट्रॅफीकमध्ये अडकलो होतो. या लग्नसराईत माझ्याच जवळच्या नातेवाइकाच लग्न होतं, मुहूर्त होता ५ वाजताचा. नवरदेव आला ५.४५ वाजता, पण नवरीला येण्यास २० मिनिटे उशीर झाला आणि विशेष म्हणजे ती २० मिनिटे नवरदेव तसाच घोड्यावर बसून राहिला होता, तेही उन्हात. पाहुण्यांचं नाव पुकारताना कोणती तरी संस्था, तिचा अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, आमदार-खासदार, अधिकारी यांची वारंवार भसाड्या आवाजात नावे घेतली जातात, काही वेळा तर त्यांचे सत्कार होत असताना बिचारे वधू-वर १०-१५ मिनिटे केवळ एकमेकांकडे पाहत असतात, काय करणार बिचारे ! काही दिवसांपूर्वी उरळी येथील लग्नसमारंभात माझं नाव कां पुकारलं नाही, म्हणून त्या नाव पुकारणाऱ्याला बाहेर बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अगदी पोलिसांपर्यंत तक्रार करण्यात आली. दुसरी घटना खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुकारून स्वागत का केले नाही म्हणून तेथील नाव पुकारणाऱ्यास मारहण करण्यात आली. बिच्चारे अमोल कोल्हे आता विचार करत असतील मी यासाठी का खासदार झालोय! आता मात्र हे अति झालं असंच म्हणावे लागेल. लग्नाची हौस सर्वांनाच असते, ते थाटामाटात व्हावे हेही आपण समजू शकतो, पण या थाटामाटात जर हे असे प्रकार घडणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार! आता तरी हे थांबवा असे म्हणण्याची वेळ आलीय. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.) 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्न